Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळात मोठ्या हालचाली घडणार आहेत. आगामी काळात ठाकरे बंधू एकत्र आले तर महाविकास आघाडीबाबत मोठा सस्पेन्स निर्माण होणार आहे. कारण दोन्ही बंधू मुंबई महापालिकेला एकत्र आले तर काँग्रेस स्वबळाचा नारा देऊ शकते. यामुळे महाविकास आघाडीत फूट पडण्याची शक्यता आहे. या घडामोडी आता कुठपर्यंत घेऊन जाणार ते पाहणं औत्सुक्याचं आहे.
रमेश चेन्नीथला नेमकं काय म्हणाले?
“राज ठाकरे यांची भूमिका ही आम्हाला अजिबात मान्य नाही. आम्ही त्यांच्या भूमिकेशी सहमत नाही. उत्तर भारत आणि दक्षिण भारत असं काही नाही. भारत एक आहे. उत्तर भारतीयांना काँग्रेस पक्षाने खूप मजबूत केलं आहे. खूप संधी देखील दिल्या आहेत. काँग्रेस आपल्या विचारधारांना घेऊन चालणार पक्ष आहे, अशी भूमिका रमेश चेन्नीथला यांनी मांडली आहे.राज ठाकरे जर उद्धव ठाकरेंसोबत आले तर? असा प्रश्न पत्रकारांनी रमेश चेन्नीथला यांना विचारला. त्यावर त्यांनी तेव्हाचं तेव्हा पाहू. अजून काही निश्चित नाही की ते दोन्ही एकत्र येतील, अशी प्रतिक्रिया रमेश चेन्नीथला यांनी दिली.
गाड्यांचा ताफा मुंबईच्या दिशेने, २ हजार कार्यकर्त्यांसह कुणाल पाटलांचा भाजपमध्ये प्रवेश होणार!
मुंबई महापालिकेची निवडणुकीत स्वबळावर लढायचं की एकत्र लढायचं याबाबत 7 तारखेला मुंबईत पक्षाची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत निर्णय घेण्यात येईल, अशी प्रतिक्रिया रमेश चेन्नीथला यांनी दिली. “प्रत्येक कार्यकर्त्याला स्वतंत्र निवडणूक लढावं, असं वाटतं. कारण ही स्थानिक पातळीवरची निवडणूक आहे”, असंदेखील रमेश चेन्नीथला म्हणाले.

