• Sat. Mar 14th, 2026

    भाजपचं ठरलं! प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंच्या जागी रवींद्र चव्हाणांची नियुक्ती, किरण रिजिजू निरीक्षक, १ जुलैला घोषणा

    भाजपचं ठरलं! प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंच्या जागी रवींद्र चव्हाणांची नियुक्ती, किरण रिजिजू निरीक्षक, १ जुलैला घोषणा

    Maharashtra BJP State President: राज्यात गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची मंत्रिपदावर वर्णी लागल्यानंतर त्यांच्या जागी नव्या प्रदेशाध्यक्षांची निवड केली जाणार होती. या पदासाठी रवींद्र चव्हाण यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात होते

    ravindra chavan (फोटो– महाराष्ट्र टाइम्स)

    मुंबई : भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाची माळ माजी मंत्री आणि पक्षाचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या गळ्यात पडणार असल्याचे निश्चित झाले आहे. याबाबतची अधिकृत घोषणा मंगळवार, १ जुलै रोजी करण्यात येणार असल्याचे पक्षाने शुक्रवारी उशिरा जाहीर केले. याच दिवशी पक्षाकडून राष्ट्रीय परिषद सदस्यांच्या नावांचीही घोषणा केली जाणार आहे, तर आज, रविवारी पक्षाच्या राज्य परिषद सदस्यांची नावे जाहीर करण्यात येणार असल्याचे पक्षाने म्हटले आहे.

    राज्यात गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची मंत्रिपदावर वर्णी लागल्यानंतर त्यांच्या जागी नव्या प्रदेशाध्यक्षांची निवड केली जाणार होती. या पदासाठी रवींद्र चव्हाण यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात होते. मात्र पक्षाकडून त्यांच्याकडे प्रथम कार्याध्यक्षपदाची धुरा देण्यात आली.
    बाबांचे नवाबांशी कौटुंबिक नातं, भुमरेंचा काय संबंध? 150 कोटींच्या जमीन गिफ्ट प्रकरणात ड्रायव्हरची प्रतिक्रिया
    याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काही दिवसांपूर्वी या निवडीचे संकेत दिले होते. अखेर पक्षाने प्रदेशाध्यक्षपदासह राष्ट्रीय परिषद सदस्यांच्या निवडणुकांच्या कार्यक्रमांची घोषणा केली. यात चव्हाण यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे, केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांची निरीक्षक म्हणूनच निवड करण्यात आली आहे. त्यांच्या उपस्थितीत चव्हाण यांच्या नावाची घोषणा केली जाणार असल्याचे सांगितले जाते.
    लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, आता Income Tax विभाग अपात्रतेची सत्यता तपासणार, जाणून घ्या
    भाजप प्रदेश कार्यालयात ३० जूनला प्रदेशाध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. दुपारी ३ ते ५ या वेळात हे अर्ज दाखल करता येतील. १ जुलैला सायंकाळी ५ वाजता प्रदेशाध्यक्ष व राष्ट्रीय परिषद सदस्यांच्या निवडीची घोषणा करण्यात येईल, अशी माहिती प्रदेश निवडणूक अधिकारी आ. चैनसुख संचेती यांनी दिली.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा