Chandrapur News : ऐन खरीप हंगामात वाघाचा धुमाकूळ; शेतीकामे ठप्प, कोंबड्या फस्त, बकरी जखमी; शेतकरी दहशतीत
सध्या खरीप हंगाम सुरू असतानाच जिल्ह्यात वाघ, बिबट्याची दहशत पसरली आहे. मागील महिन्यात नरभक्षक वाघाला पकडल्यामुळे निर्माण झालेली शांतता फार काळ टिकली नाही. गंगासार हेटी येथे बिबट्याने गावात धुमाकूळ घालत अनेक शेतकऱ्यांच्या कोंबड्या फस्त केल्यात. तर एका बकरीला गंभीर जखमी केले आहे. गावकरी तानबा तोडासे, सुदाम नान्हे, बुधाजी नान्हे यांच्या मालकीच्या कोंबड्यांचे नुकसान झाले असून, प्रमोद आत्राम यांच्या बकरीवर हल्ला झाला आहे. वाघ, बिबट्याचा वावर असल्याने शेतकामे ठप्प पडली आहेत.
