विद्यानंद बापट यांच्याकडून बोलल्या जाणाऱ्या मराठी भाषेचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केलं आहे. बापट यांनी शुद्ध मराठी भाषेत आपले विचार मांडताना सर्वसमावेशक विचार मांडावेत, अशी इच्छा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
पुणे : पुण्यात डीजेवर बंदी आणावी अशी मागणी करणारे विद्यानंद बापट हे सध्या प्रसिद्धीच्या झोतात आले आहेत. विद्यानंद बापट यांची मुद्दा मांडण्याची पद्धत आणि त्यांची शुद्ध मराठी भाषा यामुळे अनेकजण त्यांचे चाहते झाले आहेत. विद्यानंद बापट यांच्यावर नुकतंच एका इसमाकडून हल्ला झाला. बापट यांच्यावर हल्ला करणाऱ्याला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यावरील मारहाणीच्या घटनेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. तसेच त्यांनी विद्यानंद बापट यांच्या मराठीचं देखील कौतुक केलं आहे.
मुख्यमंत्री काय म्हणाले?
“सध्या बापटांची मराठी ट्रेंडींग आहे. खरोखर मराठीच्या शुद्धतेचा नमुना त्यांच्या बोलण्यातून पाहायला मिळतो. आता अपेक्षा एवढीच करु की, जशी ते अतिशय सुंदर आणि स्वच्छ मराठी वापरतात ते पाहून आपल्याला आनंद होतो. विचार मांडताना इतरांना आपल्या विचारांचा त्रास होणार नाही, आपण जसे शुद्ध मराठीत भूमिका मांडतात तसे ते अधिक सर्वसमावेशक अशा पद्धतीने ते विचार मांडतील. शुद्ध मराठीसाठी मला ट्युशनच घ्यावी लागेल. केवळ बापटच नाही तर कुणीही भाषा बोलतात तेव्हा ती भाषा ऐकून आनंद वाटतो”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
विद्यानंद बापट यांच्यावरील हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
“मी कालच विद्यानंद बापट यांना झालेल्या मारहाणीच्या घटनेचा निषेध केलेला आहे. वेगवेगळे विचार असू शकतात. काही लोकं या बाजूचे तर काही लोकं त्या बाजूचे असू शकतात. पण हिंसा ही काही योग्य नाही. प्रत्येकाने आपापला मुद्दा मांडला पाहिजे. एखादा सण आणि उत्सव आपण ज्यावेळेस साजरा करतो, तो जास्तीत जास्त पारंपरिक पद्धतीने आपल्याला साजरा करता आला तर त्याचे महत्त्व अधिक असते. पण त्याचवेळी वर्षानुवर्षे काही पद्धती त्या ठिकाणी पडतात. त्या पद्धती बंद करत असताना केवळ कायद्याच्या बडग्याने त्या बंद न करता, त्याचसोबत लोकांना विश्वासात घेऊन त्यातून मार्ग काढणं जास्त आवश्यक असतं”, असं मत मुख्यमंत्र्यांनी मांडलं.
‘डीजेमुळे भूकंपासारखा आवाज येतो’
“मी आजच पुण्याच्या पोलीस आयुक्तांशी चर्चा केली. त्यांनी मला सांगितलं की, मार्ग कसा काढायचा याबाबत बऱ्याच गोष्टींवर सर्वांचं एकमत झालं आहे. ज्या गोष्टींचा लोकांना त्रास होतो, डीजेमुळे भूकंप आल्यासारखा आवाज असतो. अशा गोष्टी होऊ नये याबाबत सगळ्यांचे एकमत होतं. त्यामुळे मला असं वाटतं की, यावेळेस पुण्यातही गणेशोत्सव आणि सर्व उत्सव पारंपरिक आणि चांगल्या पद्धतीने साजरी होताना दिसतील. विशेषत: लोकांच्या सहभागानेच डीजे संस्कृती कमी होताना दिसेल”, असं मुख्यंत्र्यांनी सांगितलं.
डीजे बंदीच्या निर्णयावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
“डीजे बंदीची पॉलिसी एकदम तयार होणार नाही. आता आम्ही सर्वांना सांगितलं आहे की, चर्चेतून प्रश्न सोडवा. आमचा अनुभव असा आहे की, ज्या ठिकाणी चर्चा केली तिथे 90 ते 95 टक्के लोकं तयार होती. त्यामुळे चर्चेतून हे घडवायचं, मग त्यानंतर त्याठिकाणी तसा आदेश काढायचा, अशा पद्धतीने काम सुरु आहे. थोडा वेळ देखील आपण दिला पाहिजे. पण दिशा पक्की आहे. आपल्याला खूप प्रचंड ध्वनी प्रदूषणापासून दूर जावं लागेल. पोलीस आयुक्त आणि मंडळ यांच्याशी चर्चा करुन डीजेबाबत योग्य निर्णय होईल”, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा