Washim Rain : वाशिम जिल्ह्यात पावसाने घातला धुमाकुळ, शेकडो हेक्टर जमीन गेली खरडून
वाशिम जिल्ह्यात दोन दिवसात झालेल्या मुसळधार पावसाने अनेक नदी नाल्यांना पूर आला होता. यात ऊतावळी नदीला पूर आल्याने शेकडो एकर जमीन पाण्याखाली गेली होती. यात मोठ्या प्रमाणात शेतातील पिकांचे, फळबागांच नुकसान झाल सोबतच शेतातील सुपीक गाळ सुद्धा वाहून गेला आहे.
