• Thu. Jun 18th, 2026

    दादा भुसे यांनी सांगितले राज ठाकरेंसोबतच्या भेटीमध्ये काय घडले

    दादा भुसे यांनी सांगितले राज ठाकरेंसोबतच्या भेटीमध्ये काय घडले

    Raj Thackeray And Dada Bhuse Meet : शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी राज ठाकरे यांची भेट घेऊन ‘त्रिभाषा’ सूत्रावर चर्चा केली, ज्यामध्ये पहिलीपासून हिंदीच्या अंमलबजावणीचा समावेश आहे. मनसेचा या भूमिकेला विरोध कायम आहे. विद्यार्थ्यांच्या हितासाठी त्रिभाषा महत्त्वाची असल्याचं भुसे यांनी सांगितले.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे हे राज ठाकरे यांच्या भेटीला गेले. राज्यातील शालेय शिक्षणात ‘त्रिभाषा सूत्रा’नुसार पहिलीपासून हिंदीच्या अंमलबजावणीवरून सुरू असलेला वाद सुरू आहे. हिंदीला मनसेचा विरोध आहे. त्यावरच चर्चा करण्यासाठी दादा भुसे हे राज ठाकरेंच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले. मात्र, अजूनही त्यावर तोडगा निघू शकला नाहीये. काही महत्वाच्या विषयावर चर्चा झाली, असल्याचेही दादा भुसे यांनी म्हटले. दादा भुसेंसह शिक्षण खात्यातील महत्वाच्या अधिकाऱ्यांनी राज ठाकरेंना हिंदी भाषा सक्तीबाबत माहिती दिली. मात्र, अजूनही राज ठाकरे हे आपल्या भूमिकेवर कायमच आहेत. राज ठाकरे आणि दादा भुसे यांच्यात अर्धा तास चर्चा झाली.

    राज ठाकरे यांच्यासोबत झालेल्या भेट ीनंतर माध्यमांना बोलताना मंत्री दादा भुसे हे म्हणाले की, ‘त्रिभाषा’ संदर्भात शिक्षण विभागातील प्रमुख अधिकारी यांच्यासोबत राज ठाकरेंची भेट घेतली. यावेळी राज ठाकरे यांच्यासोबत काही प्रमुख नेतेही उपस्थित होते. राज्यातील विद्यार्थ्यांच्या हितासाठी त्रिभाषा कशी महत्वाची आहे, हे सांगितले. चर्चा संपन्न झाली आहे. या क्षणाला तर त्यांना या गोष्टी मान्य नाहीत.
    हिंदीविरोधात राज ठाकरेंनी फुंकले रणशिंग; 6 जुलैला भव्य मोर्चाचे आयोजन, राजकीय पक्षांना केले मोठे आवाहनराज ठाकरे यांनी काही चांगल्या सूचना देखील केल्या आहेत. त्यांनी दिलेल्या सूचनांची देखील आम्ही नोंद घेतली आहे. आज जी काही चर्चा झाली आहे, ती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना देऊ. दादा भुसे यांनी स्पष्ट केले की, सध्यातरी राज ठाकरे यांना सरकारची भूमिका मान्य नाहीये. हिंदीबाबत राज ठाकरे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट ठेवली आहे. राज्यातील विद्यार्थ्यांच्या हितासाठी शासनाने हा निर्णय केला.

    हिंदी सक्तीवरील तोडगा नाहीच, दादा भुसे यांनी सांगितले राज ठाकरेंसोबतच्या भेटीमध्ये काय घडले

    याबाबतचा तोडगा कधी निघेल विचारले असताना दादा भुसे यांनी म्हटले की, आज जी काही चर्चा झाली ती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या कानावर घालू. दादा भुसे आणि राज ठाकरे यांच्या भेटीकडे सर्वांचा नजरा लागल्या होत्या. राज ठाकरे ‘त्रिभाषा’संदर्भात सकारात्मक होतील, अशा चर्चा होती. मात्र, राज ठाकरे आणि दादा भुसे यांच्या भेटीतून तोडगा निघू शकला नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री नेमका काय निर्णय घेतात, याकडे सर्वांच्या नजरा आहेत.

    शितल मुंढे

    लेखकाबद्दलशितल मुंढेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. राजकीय, मनोरंजन, शिक्षण आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. लोकमत आणि टीव्ही 9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 6 वर्षांचा अनुभव.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed