• Wed. Mar 11th, 2026
    मोबाईल गेम खेळून मनस्वास्थ्य बिघडलं, कोकणात अल्पवयीन मुलाचं टोकाचं पाऊल, नेमकं काय कारण

    Minor Ends Life in Ratnagiri : रत्नागिरी जिल्ह्यात एका १७ वर्षीय मुलाने मोबाईल गेममुळे आलेल्या नैराश्यातून आत्महत्या केली. तो सतत मोबाईलवर गेम खेळायचा. नैराश्याच्या भरात त्याने राहत्या घरी गळफास लावून जीवन संपवले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    रत्नागिरी : मोबाईल फोन आता केवळ कॉलसाठी वापरला न जाता जवळपास सर्वच लहान-मोठ्या गोष्टींसाठी वापरला जातो. मोबाईलवर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच रिल्स, गेमवर वेळ घालवण्याचा प्रकार वाढला आहे. या मोबाईलमधील व्हिडिओ गेम खेळण्याचा नादातून एक अतिशय दुर्दैवी घटना समोर आली आहे. मोबाईल गेमच्या आहारी जाण्यातून रत्नागिरीत भयंकर प्रकार घडला.

    मोबाईल गेम खेळताना आलेल्या नैराश्यातून एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना रत्नागिरीतील नाणीज नेवासा येथे घडली आहे. रवींद्र राजेंद्र बेंद्रे (वय १७, रा. नेवासा बुद्रुक, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर) असं मृत तरुणाचं नाव आहे. तो मूळचा नगर येथील होता. तर मामाकडे रत्नागिरी येथे शिकण्यासाठी आला होता.
    गॅसचं रेग्युलेटर काढताना भडका, सिलेंडरच्या स्फोटात दोन चिमुकल्यांचा हृदयद्रावक अंत, चौघे जखमी, मंगळवेढा हादरलं

    नेमकं काय घडलं?

    रत्नागिरी ग्रामीण पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रवींद्र राजेंद्र बेंद्रे हा विद्यार्थी आपल्या मामाकडे गेल्या वीस दिवसांपासून आला होता. त्याचे मामा विकास पोपट म्हसे यांच्याकडे तो महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी मामाकडे वास्तव्यास आला होता. त्याला मोबाईलवर गेम खेळण्याचं मोठं व्यसन होतं. रवींद्र यामुळेच नेहमी अस्वस्थ असायचा. यातूनच त्याच्यामध्ये तीव्र नैराश्याची निर्माण झाली होती. याच नैराश्यातून २४ जून रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास रवींद्रने आपल्या राहत्या खोलीतील लोखंडी अँगलला टॉवेलने गळफास लावून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
    Rudraprayag Accident : भीषण अपघात! प्रवाशांनी भरलेली बस नदीत कोसळली; रुद्रप्रयागमध्ये दोघांचा मृत्यू, १०हून अधिक बेपत्ता, प्रत्यक्षदर्शीमुळे समजली दुर्घटना
    हा सगळा दुर्दैवी प्रकार लक्षात येताच त्याला तातडीने जवळच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला. ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केलं.

    Ratnagiri News : मोबाईल गेम खेळून मनस्वास्थ्य बिघडलं, कोकणात अल्पवयीन मुलाचं टोकाचं पाऊल, नेमकं काय कारण

    रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात या घटनेची आकस्मित मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. या सगळ्या घटनेचा तपास पोलीस करत आहेत. रवींद्र याचा मोबाईल आणि इतर तपशील तपासण्याचं काम सुरू आहे. रवींद्र याने हे टोकाचं पाऊल उचलण्याचं नेमकं कारण काय याचीही चाचपणी पोलीस करत आहेत. या घटनेचा अधिक तपास रत्नागिरी ग्रामीणचे पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

    करिश्मा भुर्के

    लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ४ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. सामाजिक, मनोरंजन विश्लेषणात्मक लेखनाची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed