• Fri. Mar 20th, 2026
    इराण-इस्रायल युद्धाचा महाराष्ट्रात परिणाम, रोजची शंभर टन केळी निर्यात ठप्प; शेतकऱ्यांना फटका

    Israel Iran War Impact on Nanded Banana Market : नांदेड जिल्ह्यातील केळी उत्पादक इराण आणि इस्रायलमधील युद्धामुळे अडचणीत आले आहेत. युद्धाचा परिणाम केळीच्या निर्यातीवर झाला आहे. दररोज सुमारे शंभर टन केळीची निर्यात थांबली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अर्जुन राठोड, नांदेड : गेल्या जवळपास १३ दिवसांपासून इस्त्रायल आणि इराणमध्ये युद्ध सुरू आहे. या दोन देशांच्या युद्धादरम्यान अमेरिकेनेही उडी घेतली असून अमेरिकेने इस्त्रायलच्या समर्थनार्थ इराणवर क्षेपणास्त्र डागली. या इराण आणि इस्रायलमधील युद्धाचा फटका देशभरातील अनेक गोष्टींवर झाला आहे. महाराष्ट्रातही या दोन देशांतील युद्धाचा मोठा परिणाम झाला आहे. नांदेड जिल्ह्यात केळीला इराण आणि इस्रायलच्या युद्धाचा फटका बसला आहे.

    युद्धामुळे दररोज शंभर टन केळीची निर्यात ठप्प झाली आहे. दुसरीकडे आखाती देशातील दुबई आणि इरामध्ये केळीची निर्यात सुरु असून १८०० प्रतिक्विंटल दर मिळत आहे. दरम्यान युद्धामुळे निर्यात थांबल्याने शेतकऱ्यांना स्थानिक बाजारपेठेत कमी दरात केळीची विक्री करावी लागत आहे.
    Unique Village : देशातील एकमेव ‘फळांचं गाव’ महाराष्ट्रात, एकाच ठिकाणी ३० पिकं; शेतीमागे आहे खास वैशिष्ट्यं

    मराठवाड्यात ७ लाखांहून अधिक केळीचं उत्पादन

    राज्यात केळी उत्पादनात जळगावनंतर मराठवाड्यात नांदेड जिल्ह्याचा नंबर लागतो. नांदेडसह शेजारील हिंगोली आणि परभणी जिल्ह्यातील काही भाग असं जवळपास १५ हजार हेक्टर क्षेत्र केळी लागवडीचं आहे. यातून वर्षाकाठी जवळपास ७ लाख ५० हजार टन केळीचं उत्पादन होतं.
    Israel Iran War : तिसरं महायुद्ध की आणखी काही? इराणकडून इस्लामिक आर्मीची तयारी, आता अमेरिकेची एंट्री होणार?

    अर्धापुरची केळी देशासह विदेशातही प्रसिद्ध

    जिल्ह्यातील नांदेड, अर्धापूर आणि मुदखेड तालुका या भागात प्रचंड प्रमाणात केळी पिकाची लागवड केली जाते. नांदेड जिल्हा हा निर्यातक्षम केळी उत्पादनासाठी मराठवाड्यात प्रसिद्ध आहे. अर्धापुरची केळी महाराष्ट्रातच नाहीतर संपूर्ण देशात आणि विदेशातही प्रसिद्ध आहेत. आफगाणिस्तान, तुर्कस्तान, इराण, दुबई या देशात येथील केळीची निर्यात होते. या सर्व भागातील केळीची व्यापार पेठ म्हणून नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर प्रसिद्ध आहे.

    Nanded News : इराण-इस्रायल युद्धाचा महाराष्ट्रात परिणाम, दररोजची शंभर टन केळी निर्यात ठप्प; शेतकऱ्यांना फटका, गणित काय?

    दरम्यान, सध्या केळीचे दर तेजीत आहेत. बाहेर ठिकाणी १७०० ते १८०० रूपये क्विंटलला दर मिळत आहे. तर, स्थानिक बाजार पेठत १२०० ते १५०० रूपये क्विंटलला दर मिळत आहे. जवळपास शंभर टन केळी रोज बाहेर देशात पाठवण्यात येतात. इराण – इस्रायलच्या युद्धामुळे निर्यात बंदी झाली असून इराक आणि दुबई येथे पाठवण्यात येतात. तसंच सध्या आंब्याचं प्रमाण कमी झाल्यामुळे केळीला मागणी वाढली आहे. दरही पुढील काही दिवसात दोन हजार रुपये क्विंटल पर्यंत जातील, असे केळीचे व्यापारी नंदकिशोर देशमुख यांनी सांगितले.

    करिश्मा भुर्के

    लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ४ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. सामाजिक, मनोरंजन विश्लेषणात्मक लेखनाची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed