• Thu. Mar 12th, 2026

    सावधान! कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय, मुंबईच्या केईएम रुग्णालयात कोरोनामुळे दोन रुग्ण दगावले

    ByMH LIVE NEWS

    May 19, 2025
    सावधान! कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय, मुंबईच्या केईएम रुग्णालयात कोरोनामुळे दोन रुग्ण दगावले

    Covid News : मुंबईतह कोविडच्या प्रकरणांमध्ये काहीशी वाढ झाली आहे. बीएमसी आरोग्य विभागाच्या मते, साधारणपणे एका महिन्यात कोविडशी संबंधित ८ ते ९ प्रकरणे आढळतात, परंतु हवामानातील बदलामुळे यामध्ये थोडी वाढ झाली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    मुंबई : सन २०१९ आणि त्यानंतरच्या काही वर्षांमध्ये संपूर्ण जगात हाहाकार माजवणाऱ्या कोविडने पुन्हा एकदा डोके वर काढायला सुरुवात केल्याचे दिसत आहे. वाढत्या कोविड रुग्णांमध्ये, केईएम रुग्णालयात दोन मृत्यूंची नोंद झाली आहे. या दोन्ही रुग्णांचे कोविड रिपोर्टही पॉझिटिव्ह आले आहेत. परंतु रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले आहे की एका रुग्णाचा मृत्यू कर्करोगामुळे झाला. तर, दुसऱ्याचा किडनीच्या गंभीर आजाराने झाला आहे. तथापी डॉक्टर आणि बीएमसी अधिकाऱ्यांनी खबरदारी घेण्यास सांगितले आहे. आणि लोकांना न घाबरण्याचे आवाहन केले आहे.

    रुग्णालयाने कोविड प्रोटोकॉलनुसार अंत्यसंस्कार केले

    परळ येथील ५९ वर्षीय महिलेचा केईएम रुग्णालयात मृत्यू झाला. महिलेला कर्करोग होता, रुग्णालयाने मृतदेह कुटुंबाला देण्यास नकार दिला. कुटुंबाने माजी नगरसेवक अनिल कोकीळ यांच्याशी संपर्क साधला. अनिल कोकीळ म्हणाले की, महिलेला कर्करोग होता, परंतु तिचा अहवाल कोविड पॉझिटिव्ह आला. अशा परिस्थितीत, रुग्णालयाने प्रोटोकॉलनुसार मृतदेह कुटुंबाला दिला नाही. या संदर्भात रुग्णालय प्रशासनाशी बोलल्यानंतर, मृतावर कोविड प्रोटोकॉलनुसार कुटुंबातील फक्त दोन सदस्यांसह भोईवाडा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
    Maharashtra Weather Update : आजपासून राज्यात पावसाच्या सरी, १९ ते २५ मे दरम्यान नागरिकांना सतर्कतेचा इशारा

    मृत्यू प्रमाणपत्रातील कारण कोविड नाही

    मृताच्या मृत्युपत्रात मृत्यूचे कारण कोविड असे दिलेले नाही, पण मग प्रश्न असा पडतो की कोविड चाचणी का करण्यात आली? दुसऱ्या एका प्रकरणात, एका १४ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला, जी किडनीच्या गंभीर आजाराने ग्रस्त होती. याही मुलीचा कोविड रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. मोहन देसाई यांनी सांगितले की, दोन्ही रुग्णांच्या मृत्यूचे कारण इतर गंभीर आजार होते. लोकांनी घाबरून जाण्याची गरज नाही, या संदर्भात अधिक माहिती रुग्णालय प्रशासन आज प्रसारित करेल.
    अवकाळीचे १२ बळी! नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक मृत्यू, दहा दिवसांतील उत्तर महाराष्ट्राची स्थिती
    बीएमसीच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शाह म्हणाल्या की, नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही. आम्ही कोविड प्रकरणांवर लक्ष ठेवून आहोत. ऋतू बदलामुळे संसर्ग होण्याची शक्यता असते. मे महिन्यात कोविडच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे, परंतु रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आहेत.

    आशिष मोरे

    लेखकाबद्दलआशिष मोरेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि मानसशास्त्र बातम्यांमध्ये आवड. सायकॉलॉजी मध्ये विशेष अध्ययन.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed