Ramdas Athavale offer to Prakash Ambedkar : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपाईचे (आठवले गट) अध्यक्ष रामदास आठवले यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषद राजकीय मुद्द्यांवर भाष्य केले आहे. ‘राज्यात शरद पवार आणि अजित पवार तसेच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येतील असे वाटत नाही. मात्र समाजासाठी आमचे सर्व पक्ष एकत्र यावे, अशी माझी इच्छा आहे, असे आठवले म्हणाले.
‘प्रकाश आंबेडकर यांनी आमचं नेतृत्व करावं’
राज्यात सध्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोन्ही बंधू एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहेत तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि अजित पवार गट एकत्र येणार, असं वातावरण निर्माण होत आहे. रामदास आठवले कोल्हापूर दौऱ्यावर आले असता, पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिले आहे. यावेळी त्यांनी थेट वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना खुली ऑफर दिली आहे. समाजासाठी आमचे सर्व पक्ष एकत्र यावे, अशी माझी इच्छा असून प्रकाश आंबेडकर यांनी नेतृत्व करावं. ते नेतृत्व करणार असतील, तर मला मंत्रीपदाची देखील अपेक्षा नाही. मला मंत्रिपदापेक्षा समाज महत्त्वाचा आहे. प्रकाश आंबेडकर आणि मी एकत्र आलो तर समाजाचं भलं होईल. प्रकाश आंबेडकर यांनी त्यांचं वंचित बहुजन आघाडी पक्ष विसर्जित करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा रिपब्लिकन पक्षाचं नेतृत्व करावं अस रामदास आठवले म्हणाले आहेत.
Sanjay Raut: संजय राऊतांच्या अटकेमागे वेगळंच कारण? शरद पवारांनी सांगितलं 58 कोटींचं ‘ते’ प्रकरण
‘भारत पाकिस्तान यांच्यातील युद्ध हे तात्पुरतं थांबलं आहे. पाकिस्तानने दहशतवाद्यांना हाताशी धरून नागरिकांवर हल्ला केला आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन सिंदूर हाती घेऊन १०० पेक्षा जास्त दहशतवादी ठार केले. पाकव्याप्त काश्मीर आमच्या ताब्यात द्या, अशी भारत सरकारची मागणी आहे. पाकिस्तान पाकव्याप्त काश्मीर जोपर्यंत देत नाही, तोपर्यंत आरपारची लढाई झाली पाहिजे,’ असेही रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.
‘आरपारची लढाई झालीच पाहिजे’
तर ऑपरेशन सिंदूरबाबत बोलताना आठवले यांनी पाकिस्तानला खडसावलं आहे. ‘पाकिस्तान आणि भारत यांच्यातील युद्ध हे पूर्णपणे नाही तर तात्पुरता थांबलेल आहे. ट्रम्प यांनी मध्यस्थी केल्याने युद्ध थांबले हे काही खरं नाही. मात्र भारताची स्पष्ट भूमिका आहे. पाकिस्तानने दहशतवाद्यांना हाताशी धरून नागरिकांवर हल्ला केला. त्यामुळे ऑपरेशन सिंदूर हाती घेऊन आम्ही दहशतवादी ठार केले. माझी आणि पक्षाची मागणी आहे पाकव्याप्त काश्मीर जोपर्यंत मिळत नाही, तोपर्यंत आरपारची लढाई झालीच पाहिजे. तसेच दुसरा कोणी आमच्यात मध्यस्थी करण्याची गरज नाही. हा आधीच भारत नाही नवा भारत आहे. आम्ही आता ताकदवान आहोत. आम्ही पाकड्यांना घाबरत नाही,’ असे आठवले म्हणाले आहेत.
‘माझ्या कार्यकर्त्यांना संधी मिळाली पाहिजे’
तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरात लवकर होण्याची शक्यता आहे. आणि राज्यात या निवडणुका महायुती म्हणून आम्ही एकत्र लढवणार आहोत. यामध्ये आमच्या पक्षाला काही जागा मिळायला पाहिजेत अशी माझी मागणी आहे. यासाठी आपण चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस यांना भेटणार असून केवळ मला संधी मिळून चालणार नाही तर माझ्या कार्यकर्त्यांना संधी मिळाली पाहिजे. महायुतीच सरकार आल्यापासून अद्याप आमच्या कार्यकर्त्यांना संधी मिळाली नाही, पण देवेंद्र फडणवीस यांनी आता मान्य केलं आहे की आमच्या कार्यकर्त्यांना संधी देऊ असे ही रामदास आठवले म्हणाले आहेत.

