Chhatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर पाणीपुरवठा योजनेच्या कामासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने दिलेले वचन पाळण्याचे निर्देश विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी दिले. मार्च २०२६ पर्यंत जॅकवेलचे काम पूर्ण झाल्यास शहराला वाढीव पाणी मिळेल. तसेच, एंडोबोट रोबोच्या मदतीने जलवाहिनीतील अडथळा दूर करत २०० घरांचा पाणीप्रश्न मार्गी लावण्यात आला आहे.
पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा आढावा घेऊन त्याची माहिती सादर करण्यासाठी खंडपीठाने विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. या समितीची बैठक बुधवारी (१४ मे) झाली. बैठकीला समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते. त्यात महापालिका, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण या यंत्रणांचे अधिकारी, पाणीपुरवठा योजनेचे काम करणाऱ्या जीव्हीपीआर कंपनीचे प्रतिनिधी यांचा समावेश होता.
Nashik News : कांदा भिजल्याने शेतकऱ्यांचे नुकसान, उत्पादन खर्चही निघेना, नाफेड खरेदीची शेतकऱ्यांना आस
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलीप गावडे यांनी पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा आढावा घेतला. याच अनुषंगाने मंगळावारी (१३ मे) त्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली होती. या बैठकीत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी योजनेच्या कामाबद्दल शब्द दिला (कमिटमेंट केली). योजनेचे काम पूर्ण होण्यास दोन वर्षे लागतील, नऊशे मिलीमीटर व्यासाच्या योजनेच्या जलशुद्धीकरण केंद्राचे काम जून अखेरीस पूर्ण होईल, यासह विविध कामांचा रोड मॅप तयार असल्याचे प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी या बैठकीत सांगितले होते. रोड मॅप खंडपीठाला सादर केल्याचेदेखील या बैठकीत प्राधिकरणाचे अधिकारी आणि जीव्हीपीआर कंपनीच्या प्रतिनिधींनी सांगितले होते. मंगळवारच्या बैठकीत दिलेला शब्द पाळा, असे निर्देश विभागीय आयुक्तांनी बुधवारच्या बैठकीत अधिकाऱ्यांना दिले. जॅकवेलचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण झाल्यास एप्रिल महिन्यापासून शहराला २०० एमएलडी वाढीव पाणी मिळेल, असा दावा करण्यात आला आहे.
HSRP बाबत वेगळीच समस्या; गाडी गावाला, नंबरप्लेट शहरात… मुंबईत नोंदणी केलेल्या वाहनधारकांचा मोठा प्रश्न
दोनशे घरांचा पाणीप्रश्न सुटला –
एंडोबोटने जलवाहिनीत अडकलेला लाकडाचा तुकडा शोधून काढला. यामुळे दोनशे घरांचा पाण्याचा प्रश्न सुटल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे. रेहमानिया कॉलनीमधील नागरिकांना यामुळे दिलासा मिळाला. जलवाहिनीमधील तांत्रिक बिघाड, जलवाहिनीत अडकलेल्या विविध वस्तू शोधून काढण्यासाठी महापालिकेने विशिष्ट प्रकारच्या रोबोटचा वापर सुरू केला आहे. एंडोबोट या नावाने हा रोबोट ओळखला जातो. एंडोबोटमुळे अनधिकृत नळ कनेक्शन्सचादेखील मोठ्या प्रमाणावर पर्दाफाश झाला आहे. एंडोबोटमुळे जलवाहिनीमधील चोकअप काढणे सोपे झाल्याचे मानले जात आहे.
छत्रपती संभाजीनगरमधील दूषित पाण्याची समस्या रोबोटच्या मदतीने सुरळित; कसं काम करतो हा रोबो?
जलवाहिनीच्या ज्या भागात तांत्रिक बिघाड झाला असेल किंवा जलवाहिनीच्या ज्या भागात एखादी वस्तू अडकली असेल, तर जलवाहिनीचा तेवढाच भाग तोडून दुरुस्तीचे काम करणे शक्य होऊ लागले आहे. संपूर्ण जलवाहिनी बदलण्याची किंवा तोडण्याची गरज एंडोबोटमुळे संपुष्टात आल्याचे मानले जात आहे.
रहेमानिया कॉलनीमधील सुमारे दोनशे घरांना दूषित पाणी येत होते. याबाबत नागरिकांनी पालिकेकडे तक्रार केल्यावर पालिकेच्या पथकाने एंडोबोटच्या साह्याने शोध घेतला असता जलवाहिनीच्या आतमध्ये लाकडाचा एक तुकडा अडकल्याचे लक्षात आले. ज्या भागात हा तुकडा अडकला होता, तो भाग कापून काढून तुकडा बाहेर काढण्यात आला. त्यानंतर जलवाहिनीची जोडणी करून पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला. यामुळे दोनशे घरांचा दूषित पाण्याचा प्रश्न सुटल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे.

