Tukaram Mundhe FDA on Chinese Food : “पुण्यात पाषाण रोडला चायनीजच्या गाड्या असायच्या. मी आता विचार केला, की जाऊन बघावं का. आश्चर्य वाटेल, पण माझं पहिलं चायनीज फूड मी तिथेच खाललं होतं. चायनिज काय हे तोपर्यंत माहिती नव्हतं. चायनिजकडेही लक्ष द्या असं सगळे म्हणत आहेत.” असं तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केलं.
पुण्यातील पहिला अनुभव
“बीए झाल्यानंतर एमएला अॅडमिशन घेण्यासाठी मी पुण्यात आलो. एसटी महामंडळाच्या लालपरी बसने सकाळी उतरलो. त्याआधी पुण्याला कधीच आलो नव्हतो. शिवाजीनगर बस स्टँडला उतरलो. तिथून पायी विद्यापीठात गेलो, कारण काहीच माहिती नव्हतं. मी राज्यशास्त्र विभागात एमसाठी गेलो. तिथे अर्ज भरला, मार्कशीट दाखवली. तर स्टाफने सांगितलं की इथे प्रवेश मिळेल पण हॉस्टेल मिळणार नाही. चार पाच हॉस्टेल आधीच बुक झाली होती. मी म्हटलं की मी दुसरीकडे कुठेच राहू शकत नाही. मग ते म्हणाले, तुम्ही एसपी कॉलेजला प्रयत्न करा, बीएला मार्क्स चांगले असल्याने तिथेही प्रवेश मिळत होता. पण पुन्हा वसतिगृहाचा प्रश्न होता. त्यामुळे संध्याकाळच्या बसने घरी जायचं ठरलं. माझा पुण्याचा पहिला प्रवास बस स्टँड-विद्यापीठ-एसपी कॉलेज-बस स्टँड इतकंच झालं.” असं तुकाराम मुंढे यांनी सांगितलं.
Mumbai News : सापss सापss लेडीज डब्यात कल्लोळ, चेन खेचल्याने लोकल चारवेळा थांबली, कुर्ल्यात सर्व महिलांना खाली उतरवून तपासणी, शेवटी अफवा निघाली
घरापासून लांब राहण्याची अनामिक भीती
“पुढे अॅडमिशन झालं की नाही झालं, हॉस्टेल लागलं का याचाही मी विचार नाही केला. मी डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात प्रवेश घेतला. यूपीएससी करताना एमए केलं. हॉस्टेलला किती जागा आहेत, किती मुलांनी अर्ज केला, असे काहीही प्रश्न मी विचारले नाहीत, कारण माझ्या मनात दुसरंच द्वंद्व सुरु होतं. बीए होईपर्यंत मी घराबाहेर कधी पडलो नव्हतो. गावाबाहेर होतो, पण त्यावेळच्या औरंगाबादला भावासोबत राहत होतो. कुटुंबातील व्यक्तींशिवाय स्वतंत्र कधी राहिलो नव्हतो. बीए झाल्यानंतरही एकटं, घरापासून दूर राहणार कसं, ही अनामिक भीती होती. यूपीएससीची तयारी करताना जयकर लायब्ररीत अभ्यास करत होतो. माझा एक मित्र पुणे विद्यापीठात राज्यशास्त्रात एमए करत होतो. त्याच्या रुमवर शेअरिंग बेसिसवर राहत होतो. तिथे ढेकणं इतकी होती, की झोपच यायची नाही. मी त्याला म्हटलं आधी सांगितलं असतं तर कधी आलोच नसतो. पुण्याशी माझी अशी ओळख झाली.” असं तुकाराम मुंढे यांनी सांगितलं.
चायनिज फूड पुढचं टार्गेट
“बापट रोड किंवा पाषाण रोडला चायनीजच्या गाड्या असायच्या. मी आता विचार केला, की जाऊन बघाव्यात का. आश्चर्य वाटेल, पण माझं पहिलं चायनीज फूड मी तिथेच खाललं होतं. चायनिज काय हे तोपर्यंत माहिती नव्हतं. इंडिया चायना वॉर वगैरे अभ्यास मी केला होता. पण चायनिज फूडचा अभ्यास केला नव्हता. आता खूप डिमांड आहे. गेल्या दोन महिन्यात ज्या कारवाया झाल्या, त्यानंतर चायनिजकडेही लक्ष द्या म्हणत आहेत. चायनिज फूडकडे थोडं लक्ष द्यायचं आहे.” असं तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केलं.
Crime News : प्रेमात पडून लग्न, पण दहाच महिन्यात बायकोचा इंटरेस्ट गेला, रील्सचं वेड, रात्री संबंधही ठेवेना, पतीने टोक गाठलं
आवडतं स्ट्रीट फूड कोणतं?
“आवडत स्ट्रीट फूड होतं असं म्हणूया. कधी कधी कंडिशनिंगमध्ये काही गोष्टी आवडून घ्याव्या लागायच्या. प्रॉपर जेवण मिळायचं नाही. संभाजीनगरला भेळ, आमलेट पावच्या गाड्या लागायच्या. कारण गावाकडे कधी आमलेट बनवलं नव्हतं, तेव्हा आमलेट पहिल्यांदा समजलं. मग ते माझं नेहमीचं खाणं झालं होतं. फरसाण आणि केळी माझं स्टेपल फूड झालं होतं, आता जर मी ते खाण्याचा प्रयत्न केला, तर दोन तासात बोलूही शकणार नाही, घसा एकदम पॅक होईल. त्यावेळी इम्युनिटी होती. आता विचार करतो, तेल काय वापरत असतील, कसं खात होतो मी, आता तिथे गेलो तर काय होईल. आता मला कुठलंही स्ट्रीट फूड आवडत नाही. गेल्या दोन महिन्यात अजिबात आवडत नाही” असंही मुंढे म्हणाले.
