Pune Accident : पुणे शहरात अवजड वाहनांमुळे होणारे अपघात आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन गंभीर बाब आहे, असे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी म्हटले आहे. वारंवार नियम मोडणाऱ्या वाहनांवर जप्तीची कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.
वाहतूक पोलिस प्रशिक्षणाच्या सांगता समारंभात पोलिस आयुक्त अमितेशकुमार बोलत होते. या वेळी पोलिस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील आणि वाहतूक पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांच्यासह विविध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या वेळी अमितेशकुमार म्हणाले, ‘शहरात अवजड वाहतुकीमुळे मोठ्या प्रमाणात अपघात होत असून, अनेकांना त्यात प्राण गमवावा लागत आहे. खुनाच्या घटनांपेक्षाही अपघातांतील मृतांची संख्या अधिक आहे. रस्ते अपघात हे खुनाच्या गुन्ह्यापेक्षाही गंभीर असल्याचे आम्ही मानतो. त्यामुळे अवजड वाहतुकीवर अनेक निर्बंध घातले आहेत. मात्र, दंडात्मक कारवाई करूनदेखील सर्रास ही वाहने शहरात फिरताना दिसतात. या कारवाईबाबत मी नाराज आहे.’
Raigad News : स्विफ्ट थेट एसटीमध्ये घुसली, ताम्हिणी घाटात भीषण अपघात, मुळशीतील दोघांचा जागीच मृत्यू
डंपर, खासगी बसचालकांकडून सातत्याने नियमभंग केले जात असतील, तर त्यांची वाहने जप्त करून ठेवा, असे पोलिस आयुक्तांनी वाहतूक पोलिस अंमलदारांना सांगितले. कठोर कारवाईनंतरच या वाहतुकीला लगाम लागेल, असेही ते म्हणाले.
Pune News : पती शेवटच्या घटका मोजत होता, पत्नीने मोबाईलमध्ये स्टेटस ठेवत संपवलं आयुष्य; पुण्यात एकाच सरणावर दोघांवर अंत्यसंस्कार
‘मान्सून मॅनेजमेंट’
गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात साचलेल्या पाण्यामुळे आणि झाडपडीसारख्या घटनांमुळे पुण्यातील वाहतूक व्यवस्था कोलमडली होती. या पार्श्वभूमीवर यंदा संभाव्य अडथळ्यांना तोंड देण्यासाठी वाहतूक विभागाने वेळीच कंबर कसली असून, महापालिकेसह समन्वय साधत विशेष ‘मान्सून मॅनेजमेंट’ योजना आखण्यात आली आहे. त्याअंतर्गत शहरातील वाहतूक सुरळीत राहावी यासाठी येत्या आठवड्यात वाहतुकीचे मॉकड्रील घेण्यात येणार आहे.
Pune News : अवजड वाहतूक अपघातास कारण; वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास डंपर, खासगी बसचालकांवर कारवाईचा बडगा
शहरातील वाहतूक सुरळीत राहावी, यासाठी वाहतूक विभागाकडून महापालिका, अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग यांच्यात समन्वय साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गेल्या वर्षी पावसाळ्यात पुण्यात वाहतुकीची अवस्था अत्यंत बिकट झाली होती. शहरातील विविध ठिकाणी साचणारे पाणी, झाड पडण्याच्या घटना आणि खराब रस्त्यांमुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती.

