• Tue. Jun 9th, 2026
    India Pakistan Ceasefire: युद्ध बॉलिवूड फिल्म नाही, ती एक…, माजी लष्करप्रमुख नरवणे शस्त्रसंधीवर स्पष्टच बोलले

    Manoj Narvane on India Pakistan Ceasefire- माजी लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या शस्त्रसंधीवर भाष्य केले. . सीमेवरील लोकांचे हाल आणि PTSD चा उल्लेख त्यांनी केला. शांतता आणि चर्चा हेच आपले ध्येय असले पाहिजे, असे नरवणे यांनी सांगितले.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    पुणे: भारताचे माजी सेना प्रमुख मनोज नरवणे यांनी भारत पाकिस्तानमध्ये झालेल्या शस्त्रसंधीवर प्रश्न विचारणाऱ्यांना उत्तर दिले आहे. त्यांनी सांगितले की युद्ध काही रॉमेंटिक नाही किंवा ही काही बॉलिवूड फिल्म नाही. रविवारी पुण्यात झालेल्या कार्यक्रमात नरवणे बोलत होते. जर आदेश दिला गेला असता तर युद्धासाठी तयार होता. मात्र कुटनितीला त्यांचे पहिले प्राधान्य असेल. सीमेवर राहणाऱ्या लोकांवर आघात झाले आहेत. ज्यात लहान मुलेही ही सामिल आहेत. ज्यांनी गोळीबार पाहिला आहे. रात्री आश्रयासाठी धावावे लागते.

    काही निर्बुद्धांकडून आपल्यावर यु्द्ध…
    पुण्यात इस्टीट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटेट्स ऑफ इंडियाकडून आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात माजी लष्करप्रमुख पोहचले होते. तेथे त्यांनी यासंबंधी भाषण दिले. त्यांनी म्हटले की, युद्ध रॉमेंटिक नाही, ही तुमची बॉलीवूड फिल्म नाही, ही एक गंभीर बाब आहे. युद्ध किंवा हिंसा हा शेवटचा पर्याय असला पाहिजे. हेच कारण आहे की आपल्या पंतप्रधानांनी सांगितले की हे युद्धाचे युग नाही. पण काही निर्बुद्धांकडून आपल्यावर यु्द्ध लादले जाईल. पण आपण याचे स्वागत केले नाही पाहिजे.

    त्यांनी सांगितले की, ज्या लोकांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे. त्यांच्यासाठी कायमच ही दु:खदायक घटना झाली आहे. पोस्ट ट्रॉमेटिक स्ट्रेबस डिसऑर्डर नावाचा एक आजारही आहे. ज्या लोकांनी भयानक दृश्य पाहिले आहेत. ते 20 वर्षानंतरही घामाघुम होतात त्यांना मनोविकार तज्ञाची गरज पडते.

    हिंसा याचे उत्तर नाही..
    मनोज नरवणे यांनी सांगितले की त्यांची कुटनिती ही माझी पहिली पसंत असेल. मतभेद हे चर्चेच्या माध्यमांतून दूर करणे आणि ते सशस्त्र संघर्षापर्यंत नाही पोहचले पाहिजेत. आम्ही सर्व राष्ट्रीय सुरक्षेचे समान भागधारक आहोत.आपल्याला केवळ देशा देशांमधीलच तर आपले अंतर्गत मतभेदांना सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ते परिवार, राज्य, परिसर आणि समुदायामधील असो. हिंसा याचे उत्तर नाही.

    पहलगाम दहशतवादी हल्लानंतर भारतीय सैन्यदलाने 7 मेला पाकिस्तानच्या दहशतवादी तळांना उद्धवस्त केले. यात 100 हून जास्त दहशतवाद्यांचा खात्मा झाला.

    नारायण परब

    लेखकाबद्दलनारायण परब महाराष्ट्र टाइम्स मध्ये कंटेन्ट रायटर म्हणून कार्यरत आहे. २०१७ पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले आहे. नवराष्ट्रसाठी कंटेन्ट रायटर म्हणून काम केले असून विविध इंस्टाग्राम पेजसाठी ही कंटेन्टची निर्मिती केली आहे. जनसंपर्क क्षेत्रातही फ्रिलान्सर म्हणून काम करण्याचा अनुभव. ऑल इंडिया रेडिओसाठीही काम केले आहे . क्रीडा, राजकारण, देश-विदेश, मनोरंजन, करिअर, ऑटो या कार्यक्षेत्रांमध्ये विशेष रस.
    साठये महाविद्यालयातील माध्यम विभागात २०१७ पासून व्याख्याता म्हणून कार्यरत.
    … आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed