• Wed. Mar 11th, 2026

    Chandrapur News : नियती इतकी निष्ठुर कशी झाली? मातृत्व दिनीच चिमुकल्यांचे मायेचे छत्र कायमचे हरविले

    Chandrapur News : नियती इतकी निष्ठुर कशी झाली? मातृत्व दिनीच चिमुकल्यांचे मायेचे छत्र कायमचे हरविले

    Tiger Attack on Woman in Chandrapur : चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या तीन महिलांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. मृतांमध्ये शुभांगी चौधरी यांचा समावेश आहे, त्यांच्या पश्चात दोन मुले आहेत. आईच्या निधनानंतर तिच्या चिमुकल्यांनी प्रचंड आक्रोश केला. हा आक्रोश मन सुन्न करणारा होता.

    (फोटो– Lipi)

    निलेश झाडे, चंद्रपूर : आज मातृत्व दिन. आपल्या चिल्यापिल्यांना माया लावणारी माय खरंतर या पृथ्वीतलावरील सर्वात मोठं दैवत आहे. आई म्हणजे मुलांचं खरं विश्वस असते. आई मुलांची कर्ताधर्ता, गुरु, सर्वस्व असते. आई मुलांना घडवते. आईचं आपल्या आयुष्यात असणं खूप महत्त्वाचं आहे. जगभरात आज मातृत्व दिन साजरा केला जातोय. पण या मातृत्व दिनाचा आदल्या दिवशी चंद्रपुरात दोन कोवळ्या मुलांचे दैवत काळाने कायमचे हिरावलं. आईच्या मृतदेहाला बिलगून हंबरडा त्यांनी फोडला. ही दुदैवी घटना घडली चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात येणाऱ्या मेंढा माल या गावात. शुभांगी मनोज चौधरी या तेंदू पत्ता संकलनाला गेले असता वाघाचा हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यांना एक मुलगा, एक मुलगी आहे.

    चंद्रपूर जिल्ह्यात तेंदुपत्ता संकलन सुरु आहे. तेंदुपत्ता तोडण्यासाठी अगदी पहाटेच गावकरी जंगलात जातात. सिंदेवाही तालुक्यातील मेंढा माल या गावातील कांता बुधाजी चौधरी (वय 65), शुभांगी मनोज चौधरी (वय 28), रेखा शालिक शेंडे (वय 50) या तीन महिला तेंदुपत्ता तोडण्यासाठी गेल्या होत्या. तेंदुपत्ता तोडत असताना यावेळी वाघिणीने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात तिघांचा दुदैवी मृत्यू झाला. शुभांगी मनोज चौधरी यांना सोहम आणि आराध्या अशी दोन मुले आहेत. सोहम हा चौथ्या वर्गात असून आराध्या तिसऱ्या वर्गात आहे. आईचा मृत्यू झाला हे कळताच दोघांनी हंबरडा फोडला. खरंतर आज त्या दोघांना कवेत घेऊन त्यांचा डोक्यावरून आईने मायेने हात फिरवायला हवं होतं. मात्र निष्ठूर काळाने त्यांची आईची माया कायमचीच हिरावली.

    Chandrapur News : नियती इतकी निष्ठुर कशी झाली? मातृत्व दिनीच चिमुकल्यांचे मायेचे छत्र कायमचे हरविले

    दोन दिवसात चार महिलांचा बळी

    सिंदेवाही तालुक्यातील तीन महिलांच्या बळी घेतल्याच्या घटनेला काही तास झालेले असताना वाघाने पुन्हा एका महिलेचा बळी घेतला. मूल तालुक्यात येणाऱ्या नागाळा गावातील विमल बुधाजी शेंडे यांचा वाघाचा हल्ल्यात आज (रविवारी) मृत्यू झाला. या घटनानी दहशत पसरली आहे. प्रशासन या घटनांना गांभीर्याने घेईल का? असा प्रश्न उपस्थित होतोय.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed