• Sat. Mar 7th, 2026

    नागपुरात महायुतीत बिघाडीची शक्यता, राष्ट्रवादी शहराध्यक्षांनी दिला भाजपला इशारा, म्हणाले…

    नागपुरात महायुतीत बिघाडीची शक्यता, राष्ट्रवादी शहराध्यक्षांनी दिला भाजपला इशारा, म्हणाले…

    लोकसभा, विधानसभा निवडणुकीत सर्व कार्यकर्त्यांनी तुमचा प्रचार केला, महापालिकेत सन्मानजनक जागा दिल्या नाही तर, युतीचा विचार न करता स्वबळावर लढू, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नागपूर शहराध्यक्षांनी दिला आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर: लोकसभा, विधानसभा निवडणुकीत सर्व कार्यकर्त्यांनी तुमचा प्रचार केला, महापालिकेत सन्मानजनक जागा दिल्या नाही तर, युतीचा विचार न करता स्वबळावर लढू, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे (अप) शहराध्यक्ष प्रशांत पवार यांनी दिला.महापालिका निवडणुकीबाबत पक्षाची गणेशपेठेतील कार्यालयात पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी कार्याध्यक्ष श्रीकांत शिवणकर, महिला अध्यक्ष सुनीता येरणे, अनिल अहिरकर, राजेश माटे, विशाल खांडेकर, रमण ठवकर, तानाजी वनवे प्रामुख्याने उपस्थित होते.

    यापूर्वी आघाडी असताना कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. यानंतर महायुतीत लोकसभा व विधानसभा निवडणुकीत संपूर्ण पक्ष भाजपच्या खासदार, आमदारांच्या विजयासाठी कामाला लागला. ही कार्यकर्त्यांची निवडणूक असल्याने त्यांच्याही अपेक्षा आहे. दुसरीकडे आम्हालाही पक्षाचा विस्तार करायचा आहे. राज्यात महायुती असल्याने सन्मानजनक जागा मिळवण्यासाठी प्रयत्न केले जातील. योग्य प्रमाणात जागा न मिळाल्यास पक्ष पूर्ण ताकदीने निवडून लढेल, असेही पवार यांनी जाहीर केले.

    राज्यात महायुतीत सहभागी झाल्यापासून पक्षाचे बळ वाढवण्याचे प्रयत्न चालले आहेत. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत पक्षाचा जनाधार वाढला. उपमुख्यमंत्री व पक्षाध्यक्ष अजित पवार यांनी नेहमीच विकासाला साथ दिली. त्यामुळे पुढच्या आठवड्यात ‘विकासाचा वादा, अजित दादा’ही यात्रा सर्व प्रभागात काढण्यात येईल. निवडणुकीसाठी सर्वत्र पक्षाचे पॅनल सज्ज आहे. मात्र, आपल्याकडून कुठलीही घाई केली जाणार नाही. वाटाघाटीनंतर सर्व विचार केला जाईल, असेही प्रशांत पवार म्हणाले.

    सर्वाेच्च न्यायालयाने दोन दिवसांपुर्वीच महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील 4 महिन्यात घेण्याचा निर्णय दिला होता. त्यानंतर राज्यातील पक्षांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तयारीची चाचपणी करु लागले आहेत. राज्यात महायुतीचे सरकार आहे मात्र स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत अनेक ठिकाणी युतीत बिघाडी होण्याची चिन्हे दिसत आहेत. महाविकास आघाडी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये विशेषत: महापालिका एकत्र लढणवार की एकला चलो रेचे धोरण स्वीकारणार हे नेत्यांवरही अवलंबून असले तरी महायुती काय निर्णय घेते यावर अवलंबून आहे.

    नारायण परब

    लेखकाबद्दलनारायण परब महाराष्ट्र टाइम्स मध्ये कंटेन्ट रायटर म्हणून कार्यरत आहे. २०१७ पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले आहे. नवराष्ट्रसाठी कंटेन्ट रायटर म्हणून काम केले असून विविध इंस्टाग्राम पेजसाठी ही कंटेन्टची निर्मिती केली आहे. जनसंपर्क क्षेत्रातही फ्रिलान्सर म्हणून काम करण्याचा अनुभव. ऑल इंडिया रेडिओसाठीही काम केले आहे . क्रीडा, राजकारण, देश-विदेश, मनोरंजन, करिअर, ऑटो या कार्यक्षेत्रांमध्ये विशेष रस.
    साठये महाविद्यालयातील माध्यम विभागात २०१७ पासून व्याख्याता म्हणून कार्यरत.
    … आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed