• Sat. Jun 6th, 2026
    तलाठ्याला वरकमाईची हाव, फिर्यादीने फील्डिंग लावली, १० हजारांंची लाच महागात पडली

    Talathi Arrested Red Handed : अनेक सरकारी अधिकारी फाईल पुढे सरकवण्यासाठी, सातबारा, वारस नोंद, फेरफार, पाणी पुरवठा, शेतमजुरी, पोलिसांत गुन्हा दाखल करणे अशा विविध कामांसाठी खुलेआम पैसे मागतात.

    (फोटो– Lipi)

    अमुलकुमार जैन, अलिबाग : रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात सरकारी भ्रष्टाचाराला ऊत आला असून, भालगाव येथील तलाठी फिरोज मुजावर याला १०,००० रुपयांची लाच घेताना नवी मुंबई अँटी करप्शन विभागाने रंगेहात अटक केली आहे. ही कारवाई ६ मे २०२५ रोजी करण्यात आली. आता रोह्यातील सरकारी कार्यालये म्हणजे लाचखोरीची दुकाने आणि लोकसेवक म्हणजे जनतेला लुबाडणारे बनले असल्याचा आरोप नागरिकांमध्ये थेट व्यक्त होतो आहे.

    मौजे कांडणे येथील शेतजमिनीवरील वारस नोंदीसाठी तक्रारदाराने तलाठी कार्यालयात अर्ज केला होता. मात्र तलाठी फिरोज मुजावर याने या कायदेशीर कामासाठी तब्बल १५,००० रुपयांची लाच मागितली. त्यातील ५,००० रुपये गुगल पे द्वारे आधीच घेतले होते. उर्वरित १०,००० रुपये घेताना नवी मुंबई अँटी करप्शनच्या पथकाने त्याला रंगेहात पकडले. पंचसाक्षीदारांच्या उपस्थितीत सापळा यशस्वी झाला. पोलीस उप अधीक्षक नितीन दळवी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली. त्यात नितीन पवार, गिरासे, योगीराज नाईक, दिपाली सावंत, योगिता चाळके आणि चालक पोलीस हवालदार रतन गायकवाड यांचा सहभाग होता.
    Nagpur News : प्रेमात विश्वासघात झाला, प्रेयसीने विनयभंगाचा आरोपही केला, २४ वर्षीय तरुणाला मानसिक त्रास असह्य, अखेर नको तेच घडलं
    रोह्यातील तलाठी, मंडळ अधिकारी, महसूल कर्मचारी, पोलीस अधिकारी अशा अनेक सरकारी पदांवरील व्यक्तींकडून लाच मागितली जात असल्याच्या सतत तक्रारी येत आहेत. अनेक सरकारी अधिकारी फाईल पुढे सरकवण्यासाठी, सातबारा, वारस नोंद, फेरफार, पाणी पुरवठा, शेतमजुरी, पोलिसांत गुन्हा दाखल करणे अशा विविध कामांसाठी खुलेआम पैसे मागतात.
    Mumbai News : अफवा पसरवू नका, पण सावध रहा! मुंबईत सतर्कता, सुरक्षा यंत्रणा अलर्ट, कारण…
    या घटनेनंतर नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. “हे एक पकडले गेले, बाकीच्यांनाही शोधा आणि जेलमध्ये टाका!”, अशी प्रतिक्रिया रोह्यातून उमटते आहे. अनेकांनी सांगितलं की, तलाठी कार्यालय असो वा पोलीस ठाणं, लाच न दिल्यास काम होतच नाही. आता लोकांची मागणी आहे की फक्त एकच नव्हे तर सर्वच भ्रष्टाचाऱ्यांवर धडक कारवाई झाली पाहिजे.

    रोह्यातील अनेक सरकारी कर्मचारी आता “लोकसेवक” न राहता “लाचसेवक” बनले आहेत. तलाठी, मंडळ अधिकारी, पटवारी, ग्रामसेवक, अगदी काही पोलिसांपर्यंत अनेक सरकारी कर्मचाऱ्यांनी, आपली कार्यालये म्हणजे खाजगी दुकानं केल्याचा अनुभव नागरिकांना रोज येतो.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed