Raj Thackery Marathi News : पहलगाम हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ केले असले, तरी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एअर स्ट्राईकला विरोध दर्शवला आहे. युद्ध हे उत्तर नाही, अतिरेक्यांचा शोध घेऊन त्यांना कंठस्नान घालणे महत्त्वाचे आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. देशातील समस्यांकडे लक्ष देण्याची गरज असून, सरकार या गंभीर परिस्थितीतही इतर कार्यक्रमांमध्ये व्यस्त असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.
आपल्याकडे पहलगाम येथे जो हल्ला झाला, त्यावेळेला मी ट्विट केलं तेव्हा सांगितलं होतं की ज्यांनी हल्ला केला आहे त्यांना धडा शिकवायला पाहिजे, जो त्यांच्या पिढ्यांना लक्षात राहायला पाहिजे. युद्ध हे उत्तर नाही, अमिरेकेमध्ये दोन ट्विन टॉवर पाडले, त्यांनी काही युद्ध नाही केलं, अतिरेकी ठार मारले. दुसऱ्या देशामध्ये युद्ध परिस्थिती आणायची, मॉक ड्रिल करायचे सायरन वाजवणार पण ही गोष्टा का घडली याचा आपण विचार करणं गरजेचं आहे. पाकिस्तान अगोदरच बरबाद झालेला देश आहे, त्याला काय बरबार करणार आहात. प्रश्न असा आहे की, ज्या अतिरेक्यांनी हा हल्ला केला ते सापडलेले नाहीत. ज्या ठिकाणी इतकी वर्षे हजारो पर्यटक जात आहेत तिथे सिक्युरिटी का नव्हती. मला वाटतं हे प्रश्न महत्त्वाचे आहेत. आपल्या देशामध्ये कोम्बिंग ऑपरेशन करून त्यांना हुडकून कढणं महत्त्वाचं आहे. एअर स्ट्राईक करून लोकांना भरकटावून हा काही पर्याय किंवा हे उत्तर होऊ शकत नसल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
Sharad Pawar : मोदींचं अभिनंदन, पण काळजीची एक गोष्ट म्हणजे… ‘ऑपरेशन सिंदूर’वरुन शरद पवारांचं मोठं भाष्य
आपल्या देशातील प्रश्न संपत नाहीत आणि आपण युद्धाला सामोरे जात आहोत. मला वाटतं ही काही योग्य गोष्ट नाही. नाक्या-नाक्यावर ड्रग्ज मिळतात, हे येतात कुठून या गोष्टींपर्यंत पोहोचा. शाळा-महाविद्यातील मुलांपर्यंत ड्रग्ज कसे पोहोचू लागलेत. या गोष्टींच्या खोलाता गेले पाहिजे. हे नाव देऊन भावनांचा विषय येत नाही, प्रश्न असा आहे की, तु्म्ही काय पाऊल उचलताय. इतके दिवस जे काही कार्यक्रम झाले त्याची काही आवश्यकता नव्हती, असं म्हणत राज ठाकरेंच्या मोदींच्या दौऱ्यावरही भाष्य केले.
Operation Sindoor : भारत आणि पाकिस्तानसाठी पुढील ७२ तास महत्त्वाचे! Airstrike नंतर संरक्षण तज्ञांनी काय म्हटले?
सरकारच्या चुका दाखवल्या पाहिजेत. ज्यावेळेला हा प्रकार झाला त्यावेळी पंतप्रधान मोदींनी दौरा अर्धवट सोडला आणि बिहारमध्ये कॅम्पेनिंगला गेले, केरळामध्ये अदानींच्या पोर्टचे उद्घाटन केले, फिल्म इंडस्ट्रीसाठी वेवचा कार्यक्रम केला तिकडे आले. जर परस्थिती इतकी गंभीर आहे तर या गोष्टी टाळता आल्या असत्या. मॉक ड्रिल आणि एअर स्ट्राईक हे उत्तर नाही. जे अतिरेकी आहेत त्यांना हुककून काढत त्यांचा बंदोबस्त करा. कोम्बिंग ऑपरेशन करा, देशातील पोलीस दल ज्यांना सर्व गोष्टी माहिती असतात, असं राज ठाकरे म्हणाले.

