• Sat. Mar 7th, 2026
    प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, शरीरसंबंधांनी भूलवलं, तरुणीने साथीदारांसोबत मिळून तरुणाला  ब्लॅकमेल केलं

    Crime News : उद्धव रमेश खांडेभराड वय 29 राहणार चिकनगाव तालुका अंबड असे आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. याप्रकरणी सुरेश सखाराम खांडेभराड यांनी करमाड पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचा पुतण्या उद्धव खांडेभराड याला एका अज्ञात महिलेने प्रेमाच्या जाळ्यात ओढले.

    (फोटो– Lipi)

    सुशील राऊत,छत्रपती संभाजीनगर: 29 वर्षीय तरुणाला प्रेमाच्या जाळ्यात ओढून पैशाची मागणी केली. पैसे न दिल्यास गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याने तरुणाने आत्महत्या केली. ही घटना करमाड परिसरातील आडगाव ठोंबरे शिवारात घडली. याप्रकरणी आरोपी महिलेसह दोन जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील आरोपींनी आणखी तरुणांना ब्लॅकमेल केला असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

    उद्धव रमेश खांडेभराड वय 29 राहणार चिकनगाव तालुका अंबड असे आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. याप्रकरणी सुरेश सखाराम खांडेभराड यांनी करमाड पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचा पुतण्या उद्धव खांडेभराड याला एका अज्ञात महिलेने प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर उद्धव व त्याच्या वडिलांकडे पैशांची मागणी केली. महिलेने पैशाचा दगादा लावल्याने उद्धव मानसिक तणावात गेला होता. दरम्यान यातून 1 मे रोजी रात्री साडेअकरा वाजता उद्धवने आडगाव ठोंबरे शिवारात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी महिलेसह तिच्या दोन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
    लहान भावाच्या लग्नानं मोठा भाऊ नाराज, झोपेतच जीव घेतला, ‘पत्नी’ ठरली हत्येचं कारण
    दरम्यान या प्रकरणी आरोपी महिला व तिचा साथीदार ज्ञानेश्वर बोचरे (वय 29 राहणार राजनगर मुकुंदवाडी) यांच्यासह आणखी दोघांनी मिळून गुन्हा केल्याची कबुली दिली. दरम्यान या प्रकरणी करमाड पोलिसांनी ज्ञानेश्वरला अटक करून न्यायालयात हजर केले. याप्रकरणी न्यायालयाने ज्ञानेश्वर याला 8 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान याच आरोपींनी आणखी काही तरुणांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून फसवणूक केली असल्याचा संशय असून याचा तपास देखील पोलीस करीत आहे.
    Pune News: पाठलाग केला, घरात घुसला, नऊ वर्षांच्या मुलीला जिवे मारण्याची धमकी अन्… पुण्यात संताप
    दुसरीकडे, जळगावात पत्नीच्या नातेवाईकांनी 30 वर्षीय तरुणाचा खून केल्याच्या प्रकरणाला कलाटणी मिळाली आहे. घरगुती वादातून पत्नीच्या माहेरच्या मंडळींनी तरुणाचा खून केल्याचं सुरुवातीला बोललं जात होतं. मात्र पत्नीचे तिच्याच सख्ख्या मावस भावासोबत अनैतिक संबंध असल्याने तिने नवऱ्याचा खून घडवून आणला, असा आरोप मयत तरुणाच्या कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणी पाच जणांविरोधात शनीपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed