Maharashtra Weather Update: मुंबईत मंगळवार आणि बुधवार या दोन्ही दिवशी ‘यलो ॲलर्ट’ असून राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये पुढील दोन दिवसांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.
मुंबईत या दोन्ही दिवशी यलो ॲलर्ट असून राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये पुढील दोन दिवसांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. सांताक्रूझ येथे सोमवारी ३३.७, तर कुलाबा येथे ३४.२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. कुलाबा येथे दिवसभरात ७० टक्के आर्द्रता नोंदवली गेली, तर सांताक्रूझ येथे ६३ टक्के आर्द्रतेची नोंद झाली. वातावरणात येत्या दोन दिवसांमध्ये आर्द्रता आणखी वाढून तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो, असा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवला.
Heatstroke Alert! राज्यात उष्माघाताने तीन संशयितांचा मृत्यू; दोन महिन्यांत आढळले तब्बल ‘इतके’ रुग्ण
या काळामध्ये मुंबईसह पालघर आणि ठाणे या जिल्ह्यांमध्येही ‘यलो ॲलर्ट’ देण्यात आला आहे. रायगडलाही मंगळवारी आणि बुधवारी ‘यलो ॲलर्ट’ असून रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात बुधवारी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, पुणे, सातारा, सांगली या जिल्ह्यांमध्ये बुधवारपर्यंत ‘यलो ॲलर्ट’ आहे. कोल्हापूर, सांगली आणि सोलापूरला गुरुवारी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. छत्रपती संभाजी नगर, बीड, जालना येथे दोन दिवस, तर नांदेड, लातूर येथे बुधवारी आणि गुरुवारी पावसाची शक्यता आहे.
मराठवाड्याला गारपिटीनं झोडपलं, तिघांचा अंत; शेती, फळबागांचं नुकसान, पुढील 2 दिवसांसाठी इशारा
गारपिटीची शक्यता
छत्तीसगडवर घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरणारे आवर्ती चक्रीय वारे व अरबी समुद्रात दीड किलोमीटर उंचीपर्यंत घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरणारे प्रत्यावर्ती चक्रीय वारे अशा दोन्हींच्या संगमातून राज्यभरात गारपिटीची शक्यता निर्माण झाल्याची माहिती निवृत्त हवामान अधिकारी माणिकराव खुळे यांनी दिली. या प्रणालीमुळे अवकाळी पावसाचीही तीव्रता वाढली आहे. आर्द्रतेमुळे उकाड्याचे प्रमाणही अधिक आहे. सध्याच्या वातावरणात उष्णतेच्या लाटेपासून केवळ महाराष्ट्रात दिलासा मिळाल्याचे दिसत आहे

