• Mon. Jun 15th, 2026
    हर्षवर्धन सपकाळ यांची भाजपावर जोरदार टीका

    Parbhni news छ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारवर गंभीर आरोप केले. ‘अदानी आणि अंबानी’ यांच्यासाठी शक्तीपीठ महामार्ग बनवला जात आहे, असे ते म्हणाले.शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्या करत आहेत, पण सरकारला त्याची पर्वा नाही. शेतीमालाला भाव नाही, बियाणे महागले आहेत.नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्ग मराठवाडा, विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रात अशांती निर्माण करेल.

    (फोटो– Lipi)

    धनाजी चव्हाण, परभणी : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारवर जोरदार टीका केलीये. हर्षवर्धन सपकाळ यांनी यावेळी सरकारवर एक गंभीर आरोप देखील केलाय. सपकाळ म्हणाले की, अदानी आणि अंबानी यांच्यासाठी शक्तीपीठ महामार्ग सरकार करत आहे. आज परभणी जिल्ह्यात शेतकरी दांपत्य आत्महत्या करत आहे. कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्यांमध्ये आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. पण या सरकारला त्यांचे काहीच पडले नाही.

    पुढे बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, शेतीमालाला भाव नाहीतर बियाणे आणि खतांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. शेतकऱ्यांच्या मुलांची लग्न होत नाहीत. पण सरकारला मात्र त्यांचे मित्र अदानी आणि अंबानी यांचे पडले आहे. याच अदानी आणि अंबानी यांच्यासाठी हे सरकार शक्तीपीठ महामार्ग तयार करत आहे. नागपूरहून गोव्याला जाणार हा शक्तीपीठ महामार्ग मराठवाडा विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रातील शांतता भंग करणार आहे.
    Vijay Wadettiwar : ‘काँग्रेस फोडा आणि पक्ष खाली करा’; बावनकुळेंच्या त्या वक्तव्यावर वडेट्टीवार आक्रमक, जर तुम्हाला…८८ हजार कोटी रुपये खर्च करून हा शक्तिपीठ महामार्ग तयार करून हे सरकार महाराष्ट्रातील या शेतकऱ्यांना कोणती शक्ती देणार आहे. गोव्यामध्ये लोक शक्ती मिळवण्यासाठी जात नसेल जे मस्तीला आलेले आहेत ते आपली मस्ती जिरवण्यासाठी जात असतात. ८८ हजार कोटी रुपये खर्च करून हा रस्ता बांधण्यापेक्षा महाराष्ट्रातील प्रत्येक देवस्थानाला हजार हजार कोटी द्या.

    शक्तीपीठ महामार्ग हा नागपूरहून समुद्रकिनाऱ्यापर्यंत कोळसा वाहून नेण्यासाठी आणि त्याच्या तस्करीसाठी तयार करण्यात येत आहे. पुढे बोलताना सपकाळ म्हणाले की ,भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात की, काँग्रेस पक्ष फोडा आणि काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांना आपल्या पक्षात घेऊन या पण मला म्हणायचे आहे की, राज्यात, केंद्रात भाजपची सत्ता आहे. या पक्षाने काहीतरी धोरण राबवावे जेणेकरून पक्ष वाढेल. पण काँग्रेस पक्ष बोलण्याची भाषा करणे म्हणजे हे त्यांचे दुर्भाग्यपूर्ण वक्तव्य आहे.

    शक्तीपीठ महामार्ग अदानी आणि अंबानी यांच्यासाठीच म्हणत हर्षवर्धन सपकाळ यांची भाजपावर जोरदार टीका

    भाजपाला आता जनाधार राहिला नाही पंतप्रधान मोदी यांचा चेहरा आता चालत नाही. भाजपाच्या मंत्रिमंडळात आता देखील अर्ध्यापेक्षा जास्त लोक हे काँग्रेसमधून गेलेलीच मंत्री आहेत. पण काँग्रेस ही कार्यकर्ते बनवणारी फॅक्टरी आहे आमचे कार्यकर्ते तुमच्याकडे एवढे येते की एक वेळेस तुमच्या कार्यकर्त्यासहित ते सर्वजण पुन्हा काँग्रेसमध्ये येतील असे प्रदेशाध्यक्ष सपकाळ म्हणाले. सपकाळ यांनी यावेळी भाजपावर जोरदार टीका केलीय.

    शितल मुंढे

    लेखकाबद्दलशितल मुंढेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. राजकीय, मनोरंजन, शिक्षण आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. लोकमत आणि टीव्ही 9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 6 वर्षांचा अनुभव.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed