• Fri. Mar 13th, 2026
    ‘हा भारत पूर्वीचा भारत नाही, हा घुसके मारेंगेवाला…’ कोल्हापुरातून एकनाथ शिंदे कडाडले

    Eknath Shinde Reacted on India-Pakistan Conflict : पाकिस्तानचा आता कायमचा बंदोबस्त होणारच आहे, त्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. हा भारत पूर्वीचा भारत नाही, हा घुसके मारेंगेवाला भारत आहे,’ असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

    (फोटो– Lipi)

    नयन यादवाड, कोल्हापूर : ‘पाकिस्तानचा आता कायमचा बंदोबस्त होणारच आहे, त्याची प्रक्रिया सुरू झाली असून पहलगाम या ठिकाणी निरपराध लोकांना गोळ्या घालण्याचं पाप पाकिस्तानच्या अतिरेक्यांनी केलंय. तेव्हापासून या देशातील नागरिक संताप व्यक्त करत आहेत. हा भारत पूर्वीचा भारत नाही, हा घुसके मारेंगेवाला भारत आहे,’ असे म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पाकिस्तानवरील कारवाई संदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे.

    ‘ईट का जवाब पत्थर से आणि खून का जवाब खून से’

    कोल्हापुरातील जयसिंगपूर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं आणि संग्रहालयाचा उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडलं. यानंतर बोलताना एकनाथ शिंदे यांनी पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचा संताप व्यक्त करत कारवाई होणार असल्याचं म्हटलं आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशाच्या भावना कळतात त्यामुळे पंतप्रधान मोदींनी गृहमंत्री अमित शहा संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना तात्काळ काश्मीरमध्ये पाठवलं, स्वतः परदेशातील दौरा रद्द केला. ‘पाकिस्तान दहशतवाद्यांच्या मागून जे कारवाई करतोय त्याला जशास तसे उत्तर भारत देशाकडून मिळाल्याशिवाय राहणार नाही. पाकिस्तानला इट का जवाब पत्थर से आणि खून का जवाब खून से देणार’ असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

    ‘पाकिस्तानने हिंदुस्तानकडे डोळे वटारून बघण्याची हिंमत…’

    तसेच भारत-पाकिस्तान सीमेवर काश्मीरमध्ये कुपवाड येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा जवानांनी उभा केला आणि त्याला मला उद्घाटनाला बोलावलं होतं. तेथील महाराजांच्या हातातील तलवारीचं टोक पाकिस्तानकडे आहे. पाकिस्तानने हिंदुस्तानच्या भूमीकडे डोळे वटारून बघण्याची हिंमत करू नये, अशी संकल्पना जवानांची अश्वारूढ पुतळाच्या माध्यमातून आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे १२ किल्ले युनेस्कोमध्ये गेले आहेत, हा महाराष्ट्राचा स्वाभिमान असून या गडकोट किल्ल्यांचे जतन झालं पाहिजे, ही शासनाची भूमिका आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी या राज्यात गडकोट किल्ले उभे केले. आपण गडकोट किल्ल्यांचं संवर्धन करतोयच मात्र छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती लालकिल्यावर देखील आता साजरी करत आहे. शिवछत्रपतींना अभिप्रेत असलेली समाजव्यवस्था आपण निर्माण करत असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *