Sanjay Raut on Sharad Pawar| जम्मू-काश्मीरमधील हल्ल्यावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टीका केली. शरद पवारांनी सरकारला पाठिंबा दिल्यावर, राऊत यांनी आर.आर. पाटील आणि विलासराव देशमुख यांच्या राजीनाम्यांची आठवण करून दिली. अमित शहांच्या राजीनाम्यावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले.
ज्यांना सरकारला समर्थन द्यायचं त्यांनी द्यावं, ते जनतेच्या भावनांशी खेळतायेत. गृहमंत्री अमित शाह या घटनेला जबाबदारी असतील तर त्यांचा राजीनामा पंतप्रधानांनी घ्यायला हवा. मी आमची भूमिक मांडत आहे, शिवराज पाटील, आर.आर. पाटलांचा राजीनामा शरद पवारांनी का घेतला होता. जर पवारांना अमित शहांचा राजीनामा नको आहे तर मग महाराष्ट्रातील लोकभावनेचा आदर करून पवारांनी तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांची राजीनामा घेतला. काँग्रेसने विलासराव देशमुख यांचा का राजीनामा घेतला. माझ्याकडे प्रत्येक संदर्भ असून मा बोलतोय त्या जनभावना आहेत आणि इतिहासाला धरून बोलत आहेत. पाटलांचा राजीनामा ज्यांनी घेतला आणि विलासरावांना राजीनामा द्यायला लावला त्यांनी अमितशहा यांचे समर्थन करू नये. सरकार ज्या पद्धतीच्या चुका करत आहे आणि केलेल्या आहेत, त्यामुळे २७ निरपराध मारले गेलेत आणि त्या चुकांचे समर्थन करण अपराध असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. यावेळी बोलताना रायगडच्या पालकमंत्रिपदाबाबतही भाष्य केले.
दरम्यान, आदिती तटकरे या कार्यक्षम मंत्री आहेत, रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद त्यांनी भूषवलं असून त्यांना जिल्हा पूर्णपणे माहिती आहे. संयमी असून त्या भ्रष्ट नाहीत आणि आता आलेले प्रगतीपुस्तकामध्ये त्यांना ग्रेड चांगले मिळाले आहेत. रायगडसारख्या जिल्ह्याच्या पालकमंत्रिपद हे गावगुंडाकडे असता कामा नये, संयमाने काम करणाऱ्या व्यक्तीकडे असायला हवं. जो भ्रष्टाचाराच्याविरूद्ध ठामपणे उभा राहिल, मला असं वाचतं तटकरे चांगला चेहरा त्यांच्याकडे आलं असेल तर स्वागत करतो, असं म्हणत संजय राऊत यांनी नाव न घेता भरत गोगावले यांच्यावर निशाणा साधला.

