• Sun. Sep 20th, 2026

बीडमध्ये चोरट्यांकडून विहिरीतील पाण्याची चोरी, शेतकऱ्यांचे डोळे पानावले

बीडमध्ये चोरट्यांकडून विहिरीतील पाण्याची चोरी, शेतकऱ्यांचे डोळे पानावले


आजपर्यंत तुम्ही सोनं, चांदी किंवा पैसे चोरीला गेल्याचं ऐकलं असेल, पण बीडच्या साक्षाळ पिंपरी येथील त्रिंबक काशीद नामक शेतकऱ्याच्या विहिरीमधील पाणी चोरीला गेल्याची माहिती समोर आली आहे बीड जिल्ह्यामध्ये भयंकर पडलेला दुष्काळ आणि पिण्याच्या पाण्याची भासत असलेली टंचाई पाहताया शेतकऱ्याने गेल्या दोन महिन्यापूर्वी आपल्या शेतातील विहिरीमध्ये अडीच परस पाणी साठवून ठेवलं होतं. गुराढोरांसाठी आणि शेतातील वीस गुंठ्यामध्ये असलेल्या आंब्याच्या झाडांना जगवण्यासाठी हे पाणी त्यांनी साठवून ठेवलं होतं. मात्र हे पाणी चोरण्याचा काही चोरट्यांनी प्रयत्न केला आहे. यासोबत मोठ्या प्रमाणात पाणी वाया घालवलं आहे. संबंधित शेतकरी दोन दिवस आपल्या नातेवाईकांकडे लग्नाच्या सोहळ्यासाठी गेले होते. याचाच फायदा घेऊन हे कृत्य केल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed