Devendra Fadnavis On Vijay Wadettiwar : पहलगाम घटनेतील मृतांच्या नातेवाईकांनी दिलेली माहिती जे कोणी खोटे ठरवत आहेत, त्याला मुर्खपणा म्हटले पाहिजे अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांना लक्ष्य केले.
‘केंद्र सरकारच्या निर्देशानुसार ज्या पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यास सांगण्यात आले आहे ते महाराष्ट्रात असणारे सर्व नागरिक सापडले आहेत. पाकिस्तानी नागरिक भारताबाहेर गेले पाहिजे, त्या सर्वांना सांगितले गेले आहे. त्याचे ट्रॅकींग केले जात आहे. त्यांची आकडेवारी लवकरच दिली जाईल. परंतु सिंधी समाजाचे लोक दीर्घकालीन व्हिसावर भारतात आले आहेत. त्यामुळे त्यांना भारत सोडण्याचे कारण नाही. जे पाकिस्तानी नागरिक शॉर्ट टर्म व्हिसावर आले आहे, त्यांना देश सोडावे लागणार आहे’, असे फडणवीस यांनी सांगितले.
अमली पदार्थप्रकरणी मोठी कारवाई; नवी मुंबईत दोन पोलिस अटकेत, व्हॉट्सअॅप चॅटमधून धक्कादायक पुरावे समोर
यावेळी फडणवीस यांनी विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली. धर्म विचारून दहशतवाद्यांनी पर्यटकांची हत्या केली नाही, असे वडेट्टीवार म्हणाले होते. त्यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, ‘देशभरातील मृत पर्यटकांच्या नातेवाईकांच्या जखमांवर मीठ चोळण्याचे काम केले जात आहे. जे नातेवाईक त्या ठिकाणावरची परिस्थिती सांगत आहे त्यांना खोटे ठरवले जात आहे. हे खूप वाईट आहे. त्यांना पर्यटकांबद्दल संवेदना नाहीत.’
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी राज्यात आता ‘महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल’; पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांची माहिती
‘बुलेट ट्रेन प्रकल्प २०२८पर्यंत’
‘तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने अडीच वर्षे बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम बंद पाडले होते. त्यामुळे आपण अडीच वर्ष मागे गेलो. यादरम्यान गुजरात बुलेट ट्रेनच्या कामात खूप पुढे निघून गेला. आमचे सरकार आल्यानंतर हे काम आम्ही पुढे नेले. आता खूप चांगले काम झाले आहे. २०२८ पर्यंत बुलेट ट्रेनचे काम पूर्ण होईल’, असे फडणवीस म्हणाले.
‘सर्व पेपर सुरक्षित’मुंबईतील ईडीच्या इमारतीस लागलेल्या आगीत प्रत्येक पेपर सुरक्षित आहे. या आगीमुळे कोणत्याही कागदाला धक्का लागला नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. या आगीबाबत विरोधकांनी प्रश्न विचारून सरकारच्या कोंडीचा प्रयत्न केला होता. त्यावर मुख्यमंत्र्यांनी हे स्पष्टीकरण दिले.

