Nagpur Crime News : नागपुरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शोभायात्रेत गोळीबार करून दंगल घडवण्याचा कट कुख्यात गुंडाच्या टोळीने रचला होता. पोलिसांनी केलेल्या तपासात ही धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.
सोशा कॅफेचालक अविनाश भुसारी हत्याकांडात गुन्हेशाखा पोलिसांनी शैलेश ऊर्फ बंटी विनोद हिरणवार (वय ३१), अंकित ऊर्फ बाबू धीरज हिरणवार (वय २२), आदर्श ऊर्फ गोट्या रत्नाकर वालके (वय २०), शिबू राजेश यादव (वय २०) व रोहित ऊर्फ भिक्कू राजू मेश्राम (वय २०) या पाच जणांना अटक केली. पोलिसांनी त्यांची तीन दिवस पोलिस कोठडी घेतली आहे. खापरखेड्यात शेखू टोळीतील प्रवेश गुप्ता, अविराज भुसारी व त्याच्या साथीदारांनी गोळीबार करून बंटीचा भाऊ पवन याची हत्या केली. यात बंटीही जखमी झाला.
Pahalgam Terror Attack : हिंदू की मुस्लिम? कुराण वाचता? प्लॅन ए फेल झालाय, ३५ बंदुका खोऱ्यात… खेचरवाल्याबाबत पर्यटकाचा दावा
भावाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी बंटी, बाबू व त्याच्या साथीदारांनी प्रवेश व धीरज बांबोडे या दोघांच्या हत्येचा कट आखला. प्रवेश हा १४ एप्रिलला शोभायात्रा काढत असल्याची माहिती बंटीला होती. या शोभायात्रेत गोळीबार करून प्रवेशची हत्या करायची व शहरात दंगल घडवून पसार व्हायचे, असा कट बंटीने आखला. त्यानुसार १४ एप्रिलला बंटी व त्याचे साथीदार सायंकाळी पांढराबोडीत गेले. मात्र, शोभायात्रेत प्रवेश आला नाही. त्यामुळे बंटीने गोळीबार केला नाही. धीरजही त्यांना सापडला नाही. दोघेही बचावले.
Delhi Water Park : दोघांचं लग्न जमलेलं, वॉटर पार्कला फिरायला गेले आणि १५ सेकंदात होत्याचं नव्हतं, काय घडलं?
पिस्तूल खरेदीसाठी केली चोरी
प्रवेश व त्याच्या साथीदारांची हत्या करयासाठी बंटीला पिस्तुलाची गरज होती. मात्र, त्याच्याकडे पैसे नव्हते. शिबू याने नातेवाईक महिलेकडील १ लाख २० हजार रुपये चोरी केले. ऑटोचालक शाहीद याच्याकडून प्रत्येकी ४५ हजार रुपयांना तीन पिस्तुले खरेदी केली. त्यानंतर ३० काडतुसेही अन्य एकाकडून खरेदी केली.
Nagpur News : दंगल पेटवण्याचा होता कट, नागपुरातील शोभायात्रेत गोळीबाराचा प्लान फसला; धक्कादायक घटना उघड
साथीदाराला माहिती दिल्यानेच हत्या
शेखू याने अविराज व साथीदारांच्या मदतीने पवन व बंटीच्या हत्येचा कट आखला. अविराज याने याबाबत अविनाशला माहिती दिली होती, डिसेंबर महिन्यात अविनाशने अब्बास ऊर्फ आबू खान याला याबाबत कळविले होते. आबूने बंटी हिरणवारला खून होणार असल्याची माहिती दिली. अविनाशनेच याबाबत सांगितल्याचेही त्याने बंटीला सांगितले. १४ एप्रिलला प्रवेश आढळला नाही. मात्र, १५ एप्रिलला मध्यरात्री बंटी व त्याच्या साथीदारांना अविनाश हा कॅफेसमोर दिसला. बंटी व त्याच्या टोळीने डोक्यात चार गोळ्या झाडून अविनाशची हत्या केली व पसार झाले. घटनेनंतर पोलिसांनी बंटी, बाबू व त्याच्या टोळीवर हायटेक पाळत ठेवायला सुरुवात केली. अखेर बंटी, बाबूसह पाच जणांना भंडारा, गोंदिया व बल्लारशाह येथे पकडण्यात पोलिसांना यश आले.

