Authored byमानसी देवकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम27 Apr 2025, 11:39 am
पहलगाम हल्ल्यानंतर भारतातील पाकिस्तानी नागरिकांवर कारवाई करण्यात येतेय.पाकिस्तानी नागरिकांना त्यांच्या मायदेशी पाठवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील प्रशासन देखील कामाला लागलं आहे.राज्यात ५,०२३ पाकिस्तानी वास्तव्यास असून १०७ बेपत्ता असल्याची बातमी होती.मात्र कुणीही बेपत्ता नसून सर्व पाकिस्तानी नागरिक सापडल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.