• Wed. Mar 11th, 2026

    जायकवाडी धरणाचे होणार पुनरुज्जीवन; धरणाला ५० वर्षे पूर्ण, ‘ड्रीप टू’ योजनेअंतर्गत काम सुरु

    जायकवाडी धरणाचे होणार पुनरुज्जीवन; धरणाला ५० वर्षे पूर्ण, ‘ड्रीप टू’ योजनेअंतर्गत काम सुरु

    Jayakwadi Dam : २४ फेब्रुवारी १९७६ रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी जायकवाडी धरण राष्ट्राला समर्पित केले होते. या धरणाला पुढील वर्षी ५० वर्षे पूर्ण होत आहेत.

    jayakwadi dam new (फोटो– महाराष्ट्र टाइम्स)

    पैठण : जायकवाडी धरण निर्मितीला ५० वर्षे पूर्ण होत असल्याने केंद्र शासन व राज्य शासनाने ‘ड्रीप टू’ योजनेअंतर्गत धरणाचे पुनरुज्जीवन हाती घेतले आहे. कामासाठी ७८ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला असून, प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली आहे.

    तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या हस्ते १८ ऑक्टोबर १९६५ रोजी जायकवाडी धरणाचा पायाभरणी कार्यक्रम झाला होता. २४ फेब्रुवारी १९७६ रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी जायकवाडी धरण राष्ट्राला समर्पित केले होते. या धरणाला पुढील वर्षी ५० वर्षे पूर्ण होत आहेत. केंद्र व राज्य शासनाने संयुक्तपणे राज्यातील जलअभ्यासक व तज्ज्ञ अभियंत्यांची समिती नेमून, सन २०२०पासून ‘ड्रीप टू’योजनेअंतर्गत राज्यातील ५० वर्षे झालेल्या जुन्या धरणांचे पुनरुज्जीवन सुरू केले आहे. त्यात राज्यातील १२ धरणांचा समावेश आहे. पैठण येथील जायकवाडी धरणाचा समावेश करण्यात आला आहे.
    Crime News : बायकोला निर्घृणपणे संपवलं, बॉडीजवळ मुलांना कोंडून पळ काढला; 8 वर्षांच्या चिमुरड्याने बापाला जन्माची अद्दल घडवली
    जायकवाडी धरणाचे मजबुतीकरण व पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी तज्ज्ञांच्या समितीने सूचना केल्या आहेत. त्यानुसार अहवाल तयार करून नाशिक येथील ‘मेरी’ संस्थेद्वारे अहवालाची तांत्रिक तपासणी करून जायकवाडीच्या मजबुतीकरणासाठी विविध कामांचा आराखडा व अंदाजपत्रक तयार करून राज्यस्तरीय धरण सर्वेक्षण समितीला सादर करण्यात आले. या प्रस्तावास विभागाने तात्काळ मंजुरी देऊन, ७८ कोटी रुपये निधीस मान्यता दिली आहे, अशी माहिती जायकवाडी धरणाचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांनी दिली.

    जायकवाडी धरणाचे होणार पुनरुज्जीवन; धरणाला ५० वर्षे पूर्ण, ‘ड्रीप टू’ योजनेअंतर्गत काम सुरु

    या निधीचे दोन भाग करण्यात आले असून, पहिल्या टप्प्यात १७ कोटीत मुलभूत सुविधांमध्ये पर्यटकांसाठी विश्रामगृह, रस्ते, परिसराचे सुशोभीकरण, पथदिवे, हिरवळीसह इतर सुविधा उभारण्यात येणार आहेत. दुसऱ्या टप्प्यात ६१ कोटी निधीतून धरणाच्या १० किलोमीटर लांबीच्या सुरक्षा भिंतीची दुरुस्ती करणे, दगडी बांधकाम निखळल्याने त्याचे पुनरुज्जीवन करणे, धरणाचा उत्तर-दक्षिण भिंतीला अद्यावत कुंपणासह सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा भक्कम होणार आहे.

    खडकाचे सपाटीकरण करणार
    धरणाच्या २७ गेटसमोरील सांडव्याला काँक्रीट करून मजबुतीकरण करणे, धरण भरल्यानंतर गोदावरी नदीपात्रात जलविसर्ग सोडल्यानंतर धरणासमोर पात्रालगत वर आलेल्या खडकाळ भागाचे सपाटीकरण केले जाणार आहे. त्याचे काँक्रीटीकरण केल्यामुळे जलविसर्गाला अडथळा न येता पूर नियंत्रणावर लक्ष केंद्रीत करण्यास मदत होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *