Satara Crime News : मद्यधुंद अवस्थेतील पोलीस कर्मचाऱ्याने घरासमोर झोपलेल्या रमेश संकपाळ यांना चिरडले. या दुर्घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली असून दोषीवर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मौजे सर्कलवाडी (ता कोरेगाव, जि. सातारा) गावाच्या हद्दीत वाई ते वाठार स्टेशन रस्त्यावरून जात असताना पहाटे सव्वातीन वाजण्याच्या सुमारास भरधाव वेगात कार (MH 12 GR 2926) मद्यधुंद अवस्थेत, हलगर्जीपणाने आली. रमेश लक्ष्मण संकपाळ हे घरासमोर ओट्यावर झोपले असता त्यांच्या डोक्यावरून कार गेल्याने गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.
Pahalgam Terrorist : तो जीवंत असेल तर गोळी मारा… पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी आदिलच्या आईची प्रतिक्रिया, सुरक्षा दलाकडे मोठी मागणी
या घटनेच्या वेळी वाहन चालवणारा पोलीस कर्मचारी ही मद्यधुंद अवस्थेत होता. कार चालवणारा व्यक्ती पोलीस खात्यात काम करणारा असल्याचं प्राथमिक तपासातून स्पष्ट झालं आहे. त्यामुळे लोकांचा संताप आणखीनच वाढला आहे. रमेश लक्ष्मण संकपाळ हे गुरुवारी ग्रामदैवत जानुबाई देवीची यात्रा असल्याने गावात देवीचा छबीन्याचा कार्यक्रम आटोपून पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास घरासमोर ओट्यावर झोपले होते.
Pahalgam Terror Attack : हिंदू की मुस्लिम? कुराण वाचता? प्लॅन ए फेल झालाय, ३५ बंदुका खोऱ्यात… खेचरवाल्याबाबत पर्यटकाचा दावा
त्यानंतर पहाटे ३ वाजून १५ मिनिटांनी भरधाव कार थेट त्यांच्या अंगावर आली. रस्ता मोकळा असूनही चालकाने निष्काळजीपणे गाडी चालवत त्यांच्या डोक्यावरून नेल्याने ते जखमी होऊन जागीच मृत्यू झाला. तर कार चालकास किरकोळ दुखापत झाली आहे. रस्ता मोकळा असूनही चालकाने वेग न थांबवता निष्काळजीपणे गाडी चालवल्याने गाढ झोप येत असलेल्या एकाचा हकनाक बळी गेला आहे.
Pahalgam Terror Attack : ‘तुमच्यापैकी हिंदू कोण? बाबांनी हात वर करताच डोक्यात गोळी झाडली’, घटनाक्रम सांगताना लेकाला अश्रू अनावर
या घटनेनंतर सर्कलवाडी गावात संतापाचं वातावरण आहे. जे पोलीस आपली सुरक्षा करतात, त्यांच्याच बेजबाबदार वागणुकीमुळे निरपराध लोकांचा बळी जात आहे. रमेश संकपाळ हे गावात शांत, मदतीला तत्पर आणि सर्वांशी प्रेमाने वागणारे व्यक्तीमत्त्व होते. त्यांच्या जाण्याने संपूर्ण गाव हळहळ व्यक्त करत आहे. या घटनेतील दोषीवर कडक कारवाई करत सपकाळ कुटुंबियांना न्याय द्यावा, अशी मागणी होत आहे.
Satara News : ग्रामदैवताच्या यात्रेहून आले, घराच्या ओट्यावर निवांत झोपले, मद्यधुंद पोलीसाची गाडी धडकली अन् तिथंच जीव गेला
या अपघाताचा ऋतुराज कृष्णात संकपाळ यांनी वाठार स्टेशन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा तपास पोलीस हवालदार जाधव करत आहेत.

