• Sun. Mar 8th, 2026
    दोन लेकरं दत्तक घेतली, पण अंतिम क्षणी त्यांनीच पाठ फिरवली,  माऊलीवर शेजाऱ्यांकडून अंत्यविधी

    Buldhana News : ज्यावेळेस जीवनाचा अंतिम क्षण येतो त्यावेळेस आपल्या कर्त्या मुलाने आपल्या जवळ असावे किंबहुना शेवटचा श्वास त्याच्या समोर घ्यावा. याकरता जीव तात्कळत असतो. पण जेव्हा स्वतःच्या मुलापेक्षा दत्तक पुत्रावर ती जबाबदारी येते आणि तो पाठ फिरवतो त्यावेळेस त्या जीवाला काय वेदना झाल्या असतील हे विचार न केलेलेच बरा.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम
    अंतिम क्षणी मुलांनी फिरवली पाठ बुलढाण्यातील घटना

    अमोल सराफ, बुलढाणा: ज्यावेळेस आयुष्याचा अंतिम क्षण येतो त्यावेळेस आपल्या कर्त्या मुलाने आपल्या जवळ असावे किंबहुना शेवटचा श्वास त्याच्या समोर घ्यावा याकरता अनेक वेळा जीव तात्कळत असतो. पण जेव्हा स्वतःच्या मुलापेक्षा दत्तक पुत्रावर ती जबाबदारी येते आणि तो पाठ फिरवतो त्यावेळेस त्या जीवाला काय वेदना झाल्या असतील हे विचार न केलेलेच बरा.

    ज्या मुलाला दत्तक म्हणून घेतले होते. त्यांनीच शेवटच्या क्षणी पाठ फिरवल्याची ह्रदय द्रावक घटना बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील प्रशांत नगर भागात समोर आली आणि सर्वांचे मन हेलावून टाकले. नर्मदाबाई ज्ञानदेव नारखेडे वय वर्ष 75 यांचे 21 एप्रिल रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या अंत्यसंस्काराची जबाबदारी शेजाऱ्यांनी स्वीकारून माणुसकीचे दर्शन घडविले. नर्मदाबाई यांना स्वतःची संतती नव्हती. त्यामुळे त्यांनी दोन मुलांना दत्तक घेतले. मात्र एक मुंबई तर दुसरा इंदोर येथे स्थायिक असून वर्षानुवर्ष त्यांनी आईची विचारपूसही केली नाही. पतीच्या निधनानंतर नर्मदाबाई एकट्याच राहत होत्या. हनुमान जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात नर्मदाबाई दिसल्या नसल्याने शेजाऱ्यांनी चौकशी केली. एका महिलेने त्यांच्या घरी जाऊन पाहिले असता त्या बेशुद्ध अवस्थेत आढळल्या. परिसरातील डॉक्टर राजेश खोडके पंकज पाटील मंगेश एकडे, प्रमोद जंगले, बबलू कोलते, संजय पाटील निवास या परिसरातील शेजाऱ्यांनी सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने त्यांना शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल केले होते.

    नर्मदा बाई यांचे 21 एप्रिल रोजी पहाटे निधन झाले त्यानंतर परिसरातील परिचित नागरिकांनी दत्तक पुत्रांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला . वाट पाहिली मात्र मन हेलावून टाकलेला त्या दोन्ही मुलांनी कोणताच प्रतिसाद न दिल्याने त्यांच्यावर परिसरातील डॉक्टर राजेश खोडके, पंकज पाटील व त्यांच्या पत्नी ,बंडूभाऊ चौधरी माजी नगराध्यक्ष हरीश रावळ माजी नगरसेवक अनिल गांधी आदी समाजातील प्रतिष्ठित व शेजारी मंडळांनी पुढाकार घेतला. व नर्मदाबाईंवर शोकाकुल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आले.

    मात्र आता या अंतिम क्षणी कोणी एक जण त्यांच्या करता उपस्थित राहू शकला नाही. ते मात्र आता त्यांच्या मालमत्तेसाठी स्वतः समोर येऊन त्यावर हक्क दाखवतील अशी कुजबुज त्यांच्या परिसरात होत होती. त्यामुळे अंतिम क्षणी नाही एक मात्र मालमत्तेसाठी अनेक अशी काहीशी परिस्थिती निर्माण होऊ शकते.

    वृद्धपकाळात प्रत्येकालाच आधार हवा असतो आपल्या अपत्यांकडून नसेल तर किमान दत्तक मुलाकडून तरी तो अपेक्षा असते. अखेर माणुसकीच्या भावनेतून समाजच पुढे सरसावतो या घटनेने पुन्हा दाखवून दिले आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed