• Sat. Jun 6th, 2026
    शेलार म्हणाले, ‘माझ्या दृष्टीने वैयक्तिक मित्र वगैरे विषय संपला’; राजकारणातील आशिष-राज मैत्रीत दुरावा?

    Ashish Shelar and Raj Thackeray Friend : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपचे नेते आशिष शेलार यांची मैत्री सर्वश्रूत आहे. पण आता याच मैत्रीत कटूता आल्याचे चित्र आहे. याचे कारण ठरले ते राजकीय हेवेदावे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपचे नेते आशिष शेलार यांची मैत्री सर्वश्रूत आहे. पण आता याच मैत्रीत कटूता आल्याचे चित्र आहे. याचे कारण ठरले ते राजकीय हेवेदावे. ठाकरे बंधूंच्या संभाव्य मनोमिलनाबाबत मंत्री आशिष शेलारांना प्रश्न विचारण्यात आला असता ते म्हणाले, ‘आता वैयक्तिक मित्र विषय संपला,’ त्यांच्या या स्पष्ट भूमिकेमुळे राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत.

    राज ठाकरे यांनी अनेकदा आपल्या भाषणातून सत्ताधारी आमदारांना लक्ष्य केले आहे. अलीकडेच राज ठाकरेंनी आमदारांचा खोकेबहाद्दर म्हणून उल्लेख केला होता. त्यानंतर आशिष शेलार यांनीही ठाकरेंच्या वक्तव्याचा तिखट शब्दांत समाचार घेतला. ‘आपल्या पक्षाचा एकही आमदार, खासदार नसणाऱ्यांनी यावर बोलू नये’ असे आशिष शेलार म्हणाले होते. यातूनच शेलार-ठाकरेंमध्ये वादाची ठिणगी पडली होती, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

    दरम्यान, राज ठाकरेंच्या नेत्यांकडूनही शेलारांना टार्गेट करण्यात आले. यातच संदीप देशपांडे यांनीही शेलारांवर ‘आशिष झोलार’ म्हणून टीका केली. सोबतच, मनसेच्या व्यासपीठावरुनही शेलारांना लक्ष्य करुन व्यंगात्मक कविता करण्यात आली. यानंतर आशिष शेलारांनी केलेल्या या विधानामुळे दोन राजकीय मित्रांमध्ये कटुता निर्माण झाल्याचे चित्र आहे.

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed