• Fri. Mar 13th, 2026
    पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही; मराठवाडा-बीड पाणीदार करणार, CMनी सांगितली उपाययोजना

    Devendra Fadnavis on Drought in Beed Marathwada : मराठवाडा तसंच बीड जिल्हा पाणीदार करणार असल्याचं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नसल्याचं आश्वासन दिलं आहे.

    महाराष्ट्र टाइम्स

    बीड :‘मराठवाडा व बीड जिल्ह्याला कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्यासाठी शासनाने कृष्णेचे पाणी आष्टीपर्यंत आणले आहे. ते पाणी संपूर्ण बीड जिल्ह्यात पोचविण्याचा प्रण आहे. मराठवाडा व बीड जिल्ह्याला पाणीदार करण्यासाठी ५३ टीएमसी पाणी गोदाखोऱ्यात आणण्याच्या आराखड्याला देखील मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे या परिसरातील दुष्काळ कायमचा मिटेल. आजच्या या पिढीने दुष्काळ पहिला, तो पुढच्या पिढीला पाहू देणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी सांगितले. शिरूर कासार तालुक्यातील घाटशीळ पारगाव येथे श्री संत वामनभाऊ महाराज यांच्या ९३व्या नारळी सप्ताहासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. त्या वेळी ते बोलत होते.

    बीड जिल्ह्याला पाणीदार जिल्हा करणार –

    ‘बीड जिल्ह्याला नारळी सप्ताह, अध्यात्म व विचारांची मोठी परंपरा लाभली आहे. संत वामनभाऊ यांनी सुरू केलेली सप्ताहाची परंपरा अखंडपणे ९३ वर्षे सुरू आहे. या परंपरेच्या माध्यमातून समाज घडविण्याचे मोलाचे कार्य होत आहे,’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. गहिनीनाथ गडाचा विकास करताना बीड जिल्ह्याला पाणीदार जिल्हा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
    Uddhav Thackeray : मी भांडणं बाजूला ठेवायला तयार, पण माझी एकच अट, ती म्हणजे… उद्धव ठाकरे काय म्हणाले?
    या प्रसंगी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, मठाधिपती विठ्ठल बाबा महाराज, वक्फ बोर्डाचे अध्यक्ष समीर काझी, आ. सुरेश धस, आ. नमिता मुंदडा, आ. मोनिका राजळे, माजी आमदार जयदत्त क्षीरसागर, माजी आमदार भीमराव धोंडे, विभागीय आयुक्त दिलीप गावडे, विशेष पोलिस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र, जिल्हाधिकारी अविनाश पाठक उपस्थित होते.
    Solapur News : न्यूरॉलॉजिस्ट डॉ. शिरीष वळसंगकर यांनी संपवलं आयुष्य, राहत्या घरात स्वत:वर गोळ्या झाडल्या; सोलापुरात खळबळ
    मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, ‘गहिनीनाथ गडावर येणाऱ्या प्रत्येक भक्ताची उत्तम व्यवस्था झाली पाहिजे. गडासोबतच या परिसरातील भाविकांच्या सोई-सुविधांचा, तसेच या परिसराचादेखील विकास करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत.’

    ‘गहिनीनाथ गडाच्या विकासाचे काम सुरू केले आहे व अजून पुढे विकासाची ही कामे करायची आहेत. संतानी दाखविलेला भक्तीचा मार्ग समाजाने सोडलेला नाही. समाज घडविणाऱ्या या परंपरेत समाजातील सर्व घटकांचा सहभाग दिसून येत आहे. यामध्ये मुस्लिम समाज बांधवदेखील सहभागी झाले, याचा आनंद आहे. आमचे नेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्यामुळे बीड जिल्ह्याशी वेगळे नाते निर्माण झाले आहे. आज मला वामनभाऊंच्या या सप्ताहाच्या परंपरेत सहभागी होऊन आशीर्वाद घेता आला याचा मनस्वी आनंद आहे,’ असेही मुख्यमंत्री म्हणाले.

    Devendra Fadnavis : पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही; मराठवाडा-बीड पाणीदार करणार, मुख्यमंत्र्यांनी सांगितली उपाययोजना

    बीड जिल्हा नक्कीच सुजलाम, सुफलाम होईल –

    पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, ‘संत वामनभाऊ, संत भगवान बाबा यांनी या भागातील लोकांना आध्यात्मिक गोडी निर्माण करणारी सप्ताहाची परंपरा सुरू केली, ती अखंडपणे सुरू आहे. गहिनीनाथ गडाच्या विकासासाठी तसेच बीड जिल्ह्याच्या सर्वागीण विकासासाठी मुख्यमंत्री महोदय आपल्यासोबत आहेत, त्यामुळे येत्या काळात बीड जिल्हा नक्कीच सुजलाम, सुफलाम होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.’ यावेळी गडाचे मठाधिपती विठ्ठल महाराज यांनी संत वामनभाऊ यांनी ९३ वर्षापूर्वी सुरू केलेल्या अखंड नारळी सप्ताह परंपरेबाबत माहिती दिली.

    करिश्मा भुर्के

    लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ४ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. सामाजिक, मनोरंजन विश्लेषणात्मक लेखनाची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed