Raigad Two Brothers Drown: मित्रासोबत वेळास समुद्रकिनारी गेलेल्या तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. यामध्ये दोन सख्ख्या भावांचाही समावेश होता.
शेतकरी कामगार पक्षाचे तालुका चिटणीस, रायगड जिल्हा बँकेचे संचालक तथा म्हसळा तालुक्याचे हिंदु समाज उपाध्यक्ष संतोष पाटील यांच्यावर शनिवारी दुःखाचा डोंगर कोसळला. पोहायला गेलेल्या आपल्या दोन मुलांसह नातेवाईकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे समजताच त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. पोटच्या मुलांचा दुर्देवी मृत्यू झाल्याने त्यांच्यावर दु:खाचं आभाळंच कोसळलं आहे. हे ऐकून कुटुंबासह नातेवाईकांनाही धक्का बसला आहे. ही बातमी समजताच अनेकांनी त्यांच्या घराकडे धाव घेतली. नेमके काय झाले, हे ही अनेकांना माहित नव्हते. या आघाताने कुटुंब, नातेवाईक आणि गावावर शोककळा पसरली आहे.
Telangana Shocking News: बॉयफ्रेण्डसाठी पोटच्या तीन लेकरांना दह्यातून विष दिलं, नवरा उपाशीच घरातून निघाला अन्…
अत्यंत सुरक्षित आणि पर्यटकांना आवडणाऱ्या वेळास या बीचवर पोहून येतो असे सांगत म्हसळा शेकापक्षाचे तालुका चिटणीस संतोष पाटील यांचा मुलगा अवधूत संतोष पाटील आणि मयुरेश संतोष पाटील हे दोघे आणि त्यांचा मित्र हिमांशू संतोष पाटील (वय २९) हे तिघेही आज सकाळी वेळास तालुका श्रीवर्धन या बीचवर पोहून येतो असं आई-वडिलांना सांगून सुमुद्रावर गेले, ते तिघेही परत आलेच नाही. ही दुदैर्वी घटना सकाळी १०.३०च्या दरम्यान घडल्याचे दिघी सागरीच्या पोलीस सूत्रांनी सांगितलं.
Raigad News: मित्रासोबत समुद्रात पोहायला गेले ते परतलेच नाहीत, दोन सख्ख्या भावांचा अंत; कुटुंबाचा एकच टाहो
१२ वाजण्याच्या दरम्यान ते मुंबईला जाणार होते. म्हणून अवधूत आणि मयुरेश हे दोघेही समुद्रातून बाहेर आले, मात्र, हिमांशू आद्याप का आला नाही हे पाहाण्यास दोघेही भाऊ पुन्हा समुद्रात गेले असताना हिमांशू बुडताना दिसला. त्याला वाचवण्यासाठी दोन्ही भावांनी तात्काळ समुद्रात उड्या घेऊन हिमांशूला वाचविण्याचा प्रयत्न केला, मात्र यात तिघांचाही दुर्देवी मृत्यू झाला.

