• Wed. Mar 11th, 2026
    विदर्भावर सूर्य कोपला! नागपूरच्या तापमानाची झेप पन्नाशीकडे; अकोला, चंद्रपूर, वर्धाही तळपलं

    Vidarbh Weather Update : विदर्भाला उन्हाच्या तीव्र झळा बसू लागल्या आहेत. उष्णता आणि उकाडा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. दोन दिवस ढगाळ वातावरण होते. त्यामुळे उकाड्यापासून सुटका होईल असे वाटत असतानाच आज तापमानाचा पारा पुन्हा चढला आहे.

    Lipi

    निलेश झाडे, चंद्रपूर : विदर्भाला उन्हाच्या तीव्र झळा बसू लागल्या आहेत. उष्णता आणि उकाडा मोठ्या प्रमाणानात वाढला आहे. दोन दिवस ढगाळ वातावरण होते. त्यामुळे उकाड्यापासून सुटका होईल असे वाटत असतानाच आज तापमानाचा पारा वाढला. विदर्भात सर्वाधिक तापमानाची नोंद नागपूरची झाली आहे. त्यापाठोपाठ अकोला चंद्रपूर आणि वर्धा शहराचे तापमान होते.

    खरंतर विदर्भासाठी उन्हाळा नेहमीच तापदायक ठरतो. सूर्य अक्षरश: येथे आग ओकीत असल्याचा भास होतो. दुपारच्या सुमारास घराच्या बाहेर जाणे जीवावर येते. मागील आठवडाभर 40° ते त्यापेक्षा अधिक तापमान होते. आज (शनिवारी) तापमानाने उच्चांक गाठला आहे. तापमान 44 अंशाचा वर गेले. विदर्भात सर्वाधिक तापमानाची नोंद नागपूरची झाली आहे.
    Nagpur Fire : नागपुरात अग्नितांडव! डम्पिंग यार्डमध्ये भीषण आग, धुराचे लोट उसळले; अग्निशमन दलाची गाडी जळून खाक
    नागपूरचे तापमान 44.7 अंशावर पोहोचले. तर अकोल्याचे 44.3 अंश, वर्ध्याचे तापमान 44 अंश होते. वाढलेल्या तापमानामुळे नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. प्रशासनाकडून काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. तर 21, 22, 23 तारखेला विदर्भात उष्णतेची लाट असेल, असे प्रा. सुरेश चोपणे यांनी सांगितले. त्यामुळे सध्या तरी उकाड्यापासून विदर्भाची सुटका नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे.

    चंद्रपूर जिल्ह्यातही सध्या तापमानाचा पारा वाढला असून 40 अंश सेल्सियस पुढे तापमान गेले आहे. यामुळे जिल्ह्यात नागरिकांच्या आरोग्यावर उष्माघाताचा प्रकोप होऊ नये, याकरीता खासदार धानोरकर यांनी प्रशासनाला सुचना केल्या आहेत. विद्यार्थ्यांचे आरोग्य लक्षात घेता इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरु असलेल्या शाळांना तात्काळ उन्हाळी सुट्ट्या द्याव्यात. तसेच, शहरातील व तालुक्यातील प्रमुख रस्त्यांवर प्रशासनाच्या माध्यमातून पाणपोईची व्यवस्था करण्यात यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. चंद्रपूर शहरातील मुख्य रस्त्यांवर पाण्याची फवारणी करण्यासंदर्भात खासदार प्रतिभा धानोरकर यांनी प्रशासनाला सुचना केल्या आहेत. चंद्रपूर जिल्हा हा प्रामुख्याने मे महिन्यात जगात सर्वात उष्ण राहत असल्याने खासदार धानोरकर यांनी या सुचना केल्याचे सांगितले.

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed