• Sat. Mar 14th, 2026

    आधी पतीने जीव दिला, नंतर पत्नीने तडफडून प्राण सोडले, नकळत्या वयातील दोन चिमुरड्या पोरक्या

    आधी पतीने जीव दिला, नंतर पत्नीने तडफडून प्राण सोडले, नकळत्या वयातील दोन चिमुरड्या पोरक्या

    Parbhani Husband Wife ends life : धक्कादायक म्हणजे मागील दीड महिन्यात झालेली माळसोन्ना गावात झालेली आत्महत्येची ही तिसरी घटना आहे. पती-पत्नीच्या मृत्यूने जिल्हाभरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

    Lipi

    धनाजी चव्हाण, परभणी : परभणी तालुक्यातील माळसोन्ना येथे शेतकऱ्याने विष पिऊन आत्महत्या केली. पतीने आयुष्याची अखेर केल्याचं वृत्त समजताच सोमवारी (दि.14) रात्री पत्नीनेही विष प्राशन केले. या महिलेचा नांदेड येथे उपचारादरम्यान मंगळवारी (दि.15) रात्री 10 वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला. पतीपाठोपाठ पत्नीनेही आत्महत्या केल्याने जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ज्योती सचिन जाधव (वय 30) असे मयत महिलेचे नाव आहे. धक्कादायक म्हणजे मागील दीड महिन्यात झालेली माळसोन्ना गावात झालेली आत्महत्येची ही तिसरी घटना आहे. पती-पत्नीच्या मृत्यूने जिल्हाभरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

    काय घडलं नेमकं?

    परभणी तालुक्यातील माळसोन्ना येथे रविवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास सचिन बालाजी जाधव (वय 34) या तरुणाने आत्महत्या केली. शेतातील सततच्या नापिकीला कंटाळून व बहिणीच्या लग्नासाठी काढलेले कर्ज फेडण्याच्या विवंचनेतून तणावाखाली येत त्याने टोकाचे पाऊल उचलले. त्याने तणनाशक फवारणीचे विषारी द्रव्य प्राशन केले होते. मात्र परभणीतील सरकारी दवाखान्यात उपचार सुरू असताना सोमवारी रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.

    पत्नीचंही टोकाचं पाऊल

    ही बातमी समजताच त्याच्या पत्नीने देखील विष घेतले. सचिनची पत्नी ज्योती जाधव हिला सुरुवातीला परभणी येथे एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते. तिची प्रकृती चिंताजनक बनल्यामुळे तिला पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले, परंतु उपचारदरम्यान तिचाही मृत्यू झाला. या घटनेने गाव आणि परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. सचिन आणि ज्योती यांच्या पश्चात दोन मुली असून, एक मुलगी इयत्ता पहिलीत शिकते तर दुसरी केवळ अडीच वर्षाची आहे.
    Pune News : पुण्याचे धडाकेबाज निवृत्त एसीपी, स्वारगेटला जाताना अचानक झाडावरुन बाईकवर केबल पडली अन्…
    मयत सचिन बालाजी जाधव याच्या नावे असलेल्या माळसोन्ना शिवारातील शेत गट क्र. 356 मधील शेतीवर बहिणीच्या लग्नासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा दैठणाचे कर्ज काढले होते. ते कर्ज कसे फेडायचे, असे तो वडिलांना नेहमी म्हणत असे, या ताणाखाली येऊन त्याने तणनाशक फवारण्याचे विषारी द्रव्य प्यायले. याबाबत त्याचा भाऊ भागवत बालाजी जाधव याने दिलेल्या माहितीवरुन दैठणा पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
    Pune Crime : मी १२०० फूट खोल खाणीत जातोय, मुलीला शेवटचा मेसेज; पुण्याचे व्यावसायिक लक्ष्मण शिंदेंच्या हत्येचं गूढ कसं उकललं?
    दरम्यान, माळसोन्ना येथील शेतकरी भगवानराव बापूराव टेकाळे (वय ५३) यांनी शेतात सततची होत असलेली नापिकी आणि बँकेकडून घेतलेल्या कर्जाच्या विवंचनेतून शेतात विषारी द्रव्य पिऊन आत्महत्या केल्याची घटना २७ फेब्रुवारी रोजी घडली. ही घटना ताजी असतानाच पती व पत्नीने लागोपाठ आत्महत्या केल्याची घटना घडल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत | सामाजिक, राजकीय आणि मनोरंजनविषयक बातम्यांमध्ये नैपुण्य | क्राईम विषयाचा ‘मास्टरमाईंड’ | एबीपी माझा, टीव्ही९ मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 11 वर्षांहून अधिक अनुभव… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed