Ambadas Danve: बाळासाहेबांचे विचार हाच आत्मा असून, तो आजही आपल्या मनगटात आणि रोमारोमात आहे. त्यामुळे संघटनेची पुनर्बांधणी करताना शिवसैनिकांना हाच आत्मा समजून सांगितला पाहिजे.
‘प्रत्येकाने जबाबदारी ओळखून काम केले तर संघटनेची पुनर्उभारणी होईल, असे त्यांनी सांगितले. निर्धार शिबिरात ‘संघटनेचा आत्मा आणि पुनर्बांधणी’ या विषयावर अंबादास दानवे यांनी संबोधित केले. ते म्हणाले, ‘शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे आपल्यात शरीराने नसले तरी, प्रत्येकाच्या मनात आहेत. त्यामुळे बाळासाहेबांचे विचार हाच आत्मा असून, तो आजही आपल्या मनगटात आणि रोमारोमात आहे. त्यामुळे संघटनेची पुनर्बांधणी करताना शिवसैनिकांना हाच आत्मा समजून सांगितला पाहिजे.
Aditya Thackeray: महाराष्ट्राचा मणिपूर होऊ देणार नाही; आदित्य ठाकरेंचा महायुतीवर घणाघात
वक्फ विधेयकाला विरोध केला म्हणून काही जणांनी नाराजी व्यक्त केली. परंतु,आम्ही ‘डंके की चोट पर’ वक्फ विधेयकाला विरोध केला. कारण वक्फच्या जमिनी अदानी व अंबानीच्या घशात जाणार आहेत,’ असा आरोप दानवे यांनी यावेळी केला.
अनधिकृत प्रार्थनास्थळावरुन संघर्ष; २१ पोलिस जखमी, नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?
शिवसैनिकांनी जबाबदारी ओळखावी
‘शिवसेनेला नव्याने उभारी द्यायची असेल तर जनतेपर्यंत गेले पाहिजे. बाळासाहेबांचे विचार जनतेपर्यंत पोहोचले पाहिजेत. त्यासाठी स्थानिक पातळीवर आंदोलने उभी केली पाहिजे. आंदोलनात नावीन्यता आणली पाहिजे. परंतु काही जण फोटो काढण्यापुरते आंदोलन करतात. त्यामुळे शिवसैनिक आपल्या जबाबदाऱ्या विसरत चालले आहेत,’ अशा शब्दात दानवे यांनी कान टोचले.

