• Tue. Mar 10th, 2026
    विदर्भ, मराठवाड्यात वादळी पावसाची शक्यता, मुंबई-पुण्यात कसं असेल हवामान?

    Maharashtra Weather Forecast : राज्यातील काही भागात वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे, तर काही भागात हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    पुणे : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा पारा ४०च्या पुढे गेला आहे. वाढत्या उष्णतेने नागरिक हैराण झाले असून उष्माघाताने काही जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात नंदुरबारमध्ये सर्वाधिक ४६ अंश तापमानाची नोंद झाली आहे. दुसरीकडे काही जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. या यलो अलर्टमुळे विदर्भ, मराठवाड्यात वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काल गुरुवारी कोकणात उष्ण आणि दमट हवामानाची नोंद करण्यात आली होती.

    राज्यातील ‘या’ भागात हलक्या सरींची शक्यता

    दरम्यान, आठवड्यापूर्वी राज्यात नाशिक, कोकण, विदर्भ, मराठवाड्यात अवकाळीने हजेरी लावली होती. या अवकाळी पावसाने पिकांना मोठा फटका बसला होता. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं. आता नांदेड, लातूर, पुणे, सोलापूर, सिंधुदुर्ग या भागात पावसाच्या हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
    Nanded News : औषधी मिरची लागवडीचा यशस्वी प्रयोग, शेतकरी मालामाल; तब्बल ४५ लाखांचं उत्पन्न

    वादळी पावसाचा इशारा

    तर, कोल्हापूर, नागपूर, गोंदिया, वर्धा, परभणी, बीड, सातारा, अमरावती, हिंगोली, भंडारा, गडचिरोली, जालना, छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर या भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विजांचा कडकडाट होऊन पावसाचा अंदाज आहे. हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.

    पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्याने पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र आता हे कमी दाबाचं क्षेत्र निवळलं आहे. मात्र उत्तर विदर्भापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा असल्याने विदर्भात ढगाळ वातावरण राहाण्याचा अंदाज आहे.
    Mumbai News : ‘मुंबईची क्षमता आहे का?’, विचार न करताच विकासकामांना परवानगी, मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका

    Maharashtra Weather Update : विदर्भ, मराठवाड्यात वादळी पावसाची शक्यता, मुंबई-पुण्यात कसं असेल हवामान?

    उष्माघातापासून बचाव करण्याचा सल्ला

    तर मुंबई, ठाणे, रायगड, नंदुरबार, धुळे, जळगाव, पालघर या भागात हवामान कोरडं राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबईत उष्णेताच पारा वाढला असून ३५ अंशांवर जाण्याची शक्यता आहे. या काळात नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचं वारंवार सांगण्यात येत आहे. उष्माघातापासून बचाव करण्याचं सांगण्यात येत आहे. तोंडाची त्वचा कोरडी होणं, लघवीला न होणं, मळमळ, उलटी, चक्कर अशी लक्षणं दिसल्यास तात्काळ डॉक्टरांकडे जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

    करिश्मा भुर्के

    लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ४ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. सामाजिक, मनोरंजन विश्लेषणात्मक लेखनाची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed