• Sat. Mar 7th, 2026
    पहिलीत असताना आईला भेटले, तीच अखेरची भेट! बिद्रेंच्या लेकीला कोर्टात अश्रू अनावर, कंठ दाटला

    Ashwini Bidre: सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणात आज पनवेल सत्र न्यायालयात सुनावणी झाली. या हत्याकांड प्रकरणी दोषींच्या शिक्षेवरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    नवी मुंबई: सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणात आज पनवेल सत्र न्यायालयात सुनावणी झाली. या हत्याकांड प्रकरणी दोषींच्या शिक्षेवरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. या प्रकरणातील पुढील सुनावणी २१ एप्रिलला होणार आहे. आज झालेल्या सुनावणीत अश्विनी बिद्रे यांचे पती, मुलगी, वडील, भाऊ यांची बाजू ऐकून घेतली. मुख्य आरोपी अभय कुरुंदकर, त्याचा साथीदार कुंदन भंडारी, महेश फळणीकर यांचं म्हणणंदेखील ऐकून घेतलं.

    न्यायालयानं हत्याकांडातील दोषींना किती शिक्षा व्हायला हवी आणि मदत किती हवी, असा सवाल अश्विनी बिंद्रे यांची मुलगी सिद्धी गोरेला विचारला. त्यावेळी आईच्या आठवणीनं सिद्धीचा कंठ दाटून आला. न्यायालयात बोलताना तिच्या अश्रूंचा बांध फुटला. सिद्धी आईच्या आठवणीत भावुक झाली. ‘मी इयत्ता पहिलीत असताना आईला भेटले होते. त्याला आज १० वर्षे झाली. या कालावधीत माझ्या कुटुंबाला बराच त्रास सहन करावा लागला. आमच्यासाठी हा काळ संघर्षाचा होता. धमक्या आणि दहशत सहन करावी लागली. माझ्या वडिलांना कोल्हापूर ते अलिबाग आणि पनवेल अशा फेऱ्या केससाठी सतत माराव्या लागल्या,’ अशा शब्दांत सिद्धीनं कुटुंबानं केलेला संघर्ष सांगितला.
    ST कामगारांना महिन्याच्या 7 तारखेला पगार; प्रोटोकॉल तोडून मंत्री सचिवांकडे; बैठकीत ३ निर्णय
    आईच्या पोलीस खात्याचा अभिमान वाटतो. पण ज्याप्रकारे तिची हत्या झाली… असं म्हणताना सिद्धीचा कंठ दाटला. आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, असं सिद्धी म्हणाली. आपण पुढे यूपीएसएसी करणार असल्याचंही तिनं न्यायालयात सांगितलं. अश्विनी बिंद्रे यांचे वडील जयकुमार बिद्रेही न्यायालयात भावुक झाले. आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी त्यांनी केली.
    Prashant Koratkar: कोरटकरवर हल्ल्याची भीती, पोलिसांनी मीडियाच्या गाड्या रोखल्या; ‘त्या’ बातमीनं सगळ्यांनाच चकवा
    अश्विनी बिंद्रे यांचे पती राजू गोरे यांनी गेल्या १० वर्षांत त्यांच्या कुटुंबानं केलेला संघर्ष न्यायालयाला सांगितला. ‘आव्हानं खूप होती. पोलीस अधिकाऱ्यांच्या तपासात अटक शब्द नव्हता. नवी मुंबई पोलिसांकडून तपासात हलगर्जीपणा झाला. नवी मुंबई पोलीस ठाण्याची भूमिका चुकीची आहे. आमच्याकडे ते मृत्यूचा दाखला मागतात. ही नवी मुंबई पोलिसांची अनास्था आहे,’ असं राजू गोरे यांनी न्यायालयात सांगितलं. अश्विनीच्या सेवानिवृत्तीपर्यंतचं वेतन मुलीच्या शिक्षणासाठी देता आलं तर द्यावं. न्यायालयाच्या निर्णयाबद्दल मी समाधानी आहे, असं गोरे म्हणाले.

    कुणाल गवाणकर

    लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed