• Wed. Mar 11th, 2026
    राज्यात येलो अलर्ट, हवामान खात्याकडून अवकाळी पावसाचा इशारा

    Maharashtra Weather Forecast : राज्यात हवामानात मोठे बदल होत आहेत. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीनंतर, हवामान खात्याने आता आठ जिल्ह्यांमध्ये विजांच्या गडगडाटासह पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे, तर तीन जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. पारा देखील वाढताना दिसतोय.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    पुणे : गेल्या काही दिवसांपासून हवामानात सातत्याने बदल होताना दिसतोय. होळीनंतर उष्णता वाढण्याचे संकेत होते. मात्र, प्रत्यक्षात अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊस झाला. गारपिटीमुळे पिकांचे नुकसान झाले. राज्यातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाने झोडपले. अजूनही अवकाळीचे ढग आहेत. राज्यात पावसाला पोषक असे वातावरण आहे. सततच्या अवकाळी पावसामुळे पाऱ्यात घट झाली होती. मात्र, आता काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय तर काही भागांमध्ये परत एकदा अवकाळी पाऊस आणि वाऱ्याचा इशारा हा हवामान खात्याकडून देण्यात आलाय.

    अनेक शहरांमध्ये पारा ४१ अंश सेल्सिअसच्या पार

    होळीच्या अगोदर हवामान खात्याकडून उष्णतेच्या लाटेचा दोनदा इशारा देण्यात आला होता. हेच नाही तर अनेक शहरांमध्ये पारा ४१ अंश सेल्सिअसच्या आसपास गेल्याचेही बघायला मिळाले. जळगाव आणि अकोल्यात ४३.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालीये. आज हवामान खात्याकडून आठ जिल्हांमध्ये विजांसह पावसाचा येलो अलर्ट हा भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आलाय.
    Jay Pawar : अजित दादांच्या लेकाचा साखरपुडा, सुप्रिया सुळे सहकुटुंब हजेरी लावणार, दोन कुटुंब जोडणारी ‘ऋतुजा’ कोण?विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाचा मोठा इशारा

    दुसरीकडे तीन जिल्हांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय. हवामान ढगाळ असल्याने उकाडा वाढण्याचीही शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून विदर्भात सूर्य आग ओकताना दिसतोय. आता गडचिरोली, भंडारा, गोदिंया, अमरावती, वर्धा, नागपूर याठिकाणी वारे, विजांचा कडकडाट आणि पाऊस येण्याची शक्यता आहे. तसा इशाराच हवामान खात्याकडून देण्यात आलाय.

    राज्यात अवकाळीचे संकट कायम गारपिटीची शक्यता

    बीड, जालना, परभणी, छत्रपती संभाजीनगर या जिल्हांमध्ये रात्रीच्या वेळी उष्णतेत वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. कोकणात देखील हवामान खात्याकडून उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट देण्यात आला होता. अवकाळी पावसामुळे फळ बागांचे देखील मोठे नुकसान झाल्याचे राज्यात बघायला मिळतंय. पाऊस आणि वाढलेली उष्णता सध्या बघायला मिळतंय. मुंबई आणि पुण्यात सामान्य वातावरण बघायला मिळाले. सांगली, लातूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगरमध्ये अवकाळी पाऊस झाला होता. आताही अवकाळीचा इशारा देण्यात आलाय.

    शितल मुंढे

    लेखकाबद्दलशितल मुंढेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. राजकीय, मनोरंजन, शिक्षण आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. लोकमत आणि टीव्ही 9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 6 वर्षांचा अनुभव.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *