• Wed. Mar 18th, 2026

    घरातल्या जिन्यात खेळता खेळता आक्रित, नववीतील राजनंदिनीचा तडफडून मृत्यू, सोलापुरात हळहळ

    घरातल्या जिन्यात खेळता खेळता आक्रित, नववीतील राजनंदिनीचा तडफडून मृत्यू, सोलापुरात हळहळ

    Solapur Student dies of Electric Shock : राजनंदिनी कांबळे या विद्यार्थिनीला राहत्या घरात विजेचा जबर शॉक लागला. अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे विजेच्या तारा घरातील जिन्यावर पडल्या होत्या

    Lipi

    इरफान शेख, सोलापूर : सोलापूर शहरात मंगळवारचा दिवस हा विद्यार्थ्यांसाठी काळवार ठरला. मंगळवारी एकाच दिवसात दोन अतिशय दुर्दैवी घटना घडल्या. अनुराग राठोड या शाळकरी विद्यार्थ्याचा स्कूल बसच्या चाकाखाली येऊन मंगळवारी दुपारी मृत्यू झाला. या घटनेने सोलापूर शहर हळहळले. ही घटना ताजी असताना मंगळवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास एका नववीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

    राजनंदिनी कांबळे या विद्यार्थिनीला राहत्या घरात विजेचा जबर शॉक लागला. अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे विजेच्या तारा घरातील जिन्यावर पडल्या होत्या. नंदिनी जिन्यावर जाताना तिला विजेचा जबर धक्का बसला, त्यातच राजनंदिनी कांबळे हिला प्राण गमवावे लागल्याची माहिती आहे.

    वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी

    सोलापूर शहरात मंगळवारी सांयकाळी वादळी वारा सुटून अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या होत्या. सोलापूर शहरात असलेल्या जुना एम्प्लॉयमेंट चौकातील कोनापुरे चाळ येथे विजेच्या तारा तुटल्या होत्या, अशी नागरिकांनी माहिती दिली. सायंकाळी साडेसहा वाजल्यानंतर विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे वादळी वारा सुरू झाल्याने शहरात बऱ्याच वेळ लाईट गेली होती.

    नंदिनीचा स्पर्श लोखंडी जिन्याला

    कोणापूरे चाळमधील नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या वादळी वाऱ्यामुळे विजेच्या तारा हलू लागल्या होत्या. कांबळेंच्या घरावरुन जाणाऱ्या विजेच्या तारेचा स्पर्श त्यांच्या लोखंडी जिन्याला झाल्याने त्यामध्ये करंट उतरला होता. त्याच वेळी राजनंदिनी हिचा स्पर्श त्या जिन्याला झाल्याने तिला विजेचा जोरदार धक्का बसला आणि ती जागीच कोसळली.
    Wardha Accident : चला येतो लवकरच; निरोप घेऊन वैद्य कुटुंब निघालं ते कायमचंच, अपघातात चौघंही ठार, गावाच्या डोळ्याची धार थांबेना
    नातेवाईकांनी तातडीने तिला सोलापुरातील एका खाजगी रुग्णालयात हलवले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. कोनापुरे चाळ परिसरात महावितरणच्या हलगर्जीपणामुळे या विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याचा आरोप या परिसरातील नागरिक करीत आहेत.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत | सामाजिक, राजकीय आणि मनोरंजनविषयक बातम्यांमध्ये नैपुण्य | क्राईम विषयाचा ‘मास्टरमाईंड’ | एबीपी माझा, टीव्ही९ मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 11 वर्षांहून अधिक अनुभव… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed