Chhatrapati Sambhajinagar News : आठ महिन्यांपूर्वी किडनी निकामी झाल्याने समाधान खचून गेले. मुलगा कोणत्याही परिस्थितीत आयुष्यमान व्हावा, यासाठी वयोवृद्ध वडिलांनी स्वत:ची किडनी दान करत जगासमोर आदर्श निर्माण केला
नेमकं काय घडलं?
बुलढाणा तालुक्यातील माळवंडी येथील रामदास तुळशीराम इंगळे यांना समाधान (४८) हा एकुलता एक मुलगा होता. काही वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नीचे निधन झाले. पुत्र समाधान यांना वडिलांनी कष्ट उपसून शिक्षण दिले. बीई केमिकल इंजिनीअरिंगपर्यंत उच्चशिक्षित झालेले समाधान यांनी मुंबई, छत्रपती संभाजीनगर येथे नोकरी केली.
वडिलांच्या सेवेसाठी नोकरी सोडली
वडिलांची सेवा करता यावी याकरिता त्यांनी ती नोकरी सोडली आणि बुलढाणा येथे फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक्सचा व्यवसाय सुरू केला. आठ महिन्यांपूर्वी किडनी निकामी झाल्याने समाधान खचून गेले. मुलगा कोणत्याही परिस्थितीत आयुष्यमान व्हावा, यासाठी वयोवृद्ध वडिलांनी स्वत:ची किडनी दान करत जगासमोर आदर्श निर्माण केला. मात्र, हे नियतीला मान्य झाले नाही.
उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली
काही दिवसांतच समाधान यांची प्रकृती बिघडली. सोमवारी पहाटे साडेबाराच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर येथे उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले.
Buldhana Accident : बुलढाण्यात एसटी, खासगी बस आणि गाडीचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू, २४ प्रवासी जखमी
शेतकऱ्याचा अवयव विक्रीचा निर्णय
दुसरीकडे, नापिकीच्या दुष्टचक्रात अडकल्याने पीककर्जाची परतफेड करणे शक्य नाही. त्यामुळे पत्नी आणि दोन मुलांसह अवयव विकण्याचा निर्णय घेतला असल्याचे फलक लावून आडोळीतील एका शेतकऱ्याने लक्ष वेधले. वाशीम शहरातील पाटणी चौकाच्या मधोमध उभे राहून या शेतकऱ्यांने आंदोलन करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठविले.
Pune Murder : अनैतिक संबंधांचा संशय, पुण्यात २२ वर्षीय तरुणाचा जीव घेतला, ४२ वर्षीय शेजारी पसार
‘शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही, त्यांनी आपले कर्ज भरावे,’ असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्यानंतर शेतकरी हादरला आहे. यातूनच वाशीम तालुक्यातील आडोळीच्या सतीश इढोळे यांनी हे लक्षवेधी आंदोलन केले.

