• Mon. Mar 16th, 2026
    पत्नी गेली, लेक आजारी; पित्याकडून स्वतःची किडनी दान, मात्र नियतीने आधार हिसकावलाच

    Chhatrapati Sambhajinagar News : आठ महिन्यांपूर्वी किडनी निकामी झाल्याने समाधान खचून गेले. मुलगा कोणत्याही परिस्थितीत आयुष्यमान व्हावा, यासाठी वयोवृद्ध वडिलांनी स्वत:ची किडनी दान करत जगासमोर आदर्श निर्माण केला

    महाराष्ट्र टाइम्स

    छत्रपती संभाजीनगर : पत्नीचे निधन झाल्याने मुलाच्या डोक्यावरील मातृछत्र हरविले. यातच एकुलता एक मुलगा किडनीच्या आजाराने ग्रस्त झाला. मुलाला वाचविण्यासाठी वडिलांनी धडपड केली आणि स्वत:ची किडनी देऊन (Kidney Transplant) प्राण वाचविले. मात्र, नियतीने डाव साधला. किडनीचे प्रत्यारोपण झाल्यानंतरही प्रकृती बिघडली आणि मुलाने जगाचा निरोप घेतला. वृद्धावस्थेत रामदास इंगळे यांच्या आधाराची काठी मोडली. छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथे झालेल्या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

    नेमकं काय घडलं?

    बुलढाणा तालुक्यातील माळवंडी येथील रामदास तुळशीराम इंगळे यांना समाधान (४८) हा एकुलता एक मुलगा होता. काही वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नीचे निधन झाले. पुत्र समाधान यांना वडिलांनी कष्ट उपसून शिक्षण दिले. बीई केमिकल इंजिनीअरिंगपर्यंत उच्चशिक्षित झालेले समाधान यांनी मुंबई, छत्रपती संभाजीनगर येथे नोकरी केली.

    वडिलांच्या सेवेसाठी नोकरी सोडली

    वडिलांची सेवा करता यावी याकरिता त्यांनी ती नोकरी सोडली आणि बुलढाणा येथे फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक्सचा व्यवसाय सुरू केला. आठ महिन्यांपूर्वी किडनी निकामी झाल्याने समाधान खचून गेले. मुलगा कोणत्याही परिस्थितीत आयुष्यमान व्हावा, यासाठी वयोवृद्ध वडिलांनी स्वत:ची किडनी दान करत जगासमोर आदर्श निर्माण केला. मात्र, हे नियतीला मान्य झाले नाही.

    उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली

    काही दिवसांतच समाधान यांची प्रकृती बिघडली. सोमवारी पहाटे साडेबाराच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर येथे उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले.
    Buldhana Accident : बुलढाण्यात एसटी, खासगी बस आणि गाडीचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू, २४ प्रवासी जखमी

    शेतकऱ्याचा अवयव विक्रीचा निर्णय

    दुसरीकडे, नापिकीच्या दुष्टचक्रात अडकल्याने पीककर्जाची परतफेड करणे शक्य नाही. त्यामुळे पत्नी आणि दोन मुलांसह अवयव विकण्याचा निर्णय घेतला असल्याचे फलक लावून आडोळीतील एका शेतकऱ्याने लक्ष वेधले. वाशीम शहरातील पाटणी चौकाच्या मधोमध उभे राहून या शेतकऱ्यांने आंदोलन करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठविले.
    Pune Murder : अनैतिक संबंधांचा संशय, पुण्यात २२ वर्षीय तरुणाचा जीव घेतला, ४२ वर्षीय शेजारी पसार
    ‘शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही, त्यांनी आपले कर्ज भरावे,’ असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्यानंतर शेतकरी हादरला आहे. यातूनच वाशीम तालुक्यातील आडोळीच्या सतीश इढोळे यांनी हे लक्षवेधी आंदोलन केले.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत | सामाजिक, राजकीय आणि मनोरंजनविषयक बातम्यांमध्ये नैपुण्य | क्राईम विषयाचा ‘मास्टरमाईंड’ | एबीपी माझा, टीव्ही९ मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 11 वर्षांहून अधिक अनुभव… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed