• Sat. Mar 7th, 2026

    तरुणाला भरदिवसा दोघांनी संपवलं, प्रेमप्रकरणातून घडली भयंकर घटना; बीड हादरलं

    तरुणाला भरदिवसा दोघांनी संपवलं, प्रेमप्रकरणातून घडली भयंकर घटना; बीड हादरलं

    Beed Youth Murder Case: बीडमध्ये एका तरुणावर दोघांनी सपासप वार करुन त्याला गंभीर जखमी केले, याघटनेत उपचारादरम्यान अतिसक्तस्त्राव झाल्याने त्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. प्रेमप्रकरणातून ही हत्या झाल्याची माहिती आहे.

    Lipi

    दीकप जाधव, बीड: बीड जिल्हा पुन्हा एकदा हादरला आहे. येथे दोन युवकांकडून दिवसाढवळ्या एका तरुणावर कोयत्याने सपासप वार करण्यात आले. या घटनेत उपचारादरम्यान त्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी (१ एप्रिल) सकाळी ९ वाजताच्या दरम्यान घडल्याची माहिती आहे. आहे. राजकुमार साहेबराव करडे (वय ३०, रा. गवळीपुरा, अंबाजोगाई) असं या हल्ल्यात मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. प्रेमप्रकरणातून ही हत्या झाल्याची माहिती आहे.

    दोन तरुणांनी भरदिवसा तरुणावर हल्ला केला

    दोन युवकांनी कोयता सदृश धारदार हत्याराने राजकुमारच्या गळ्यावर, डोक्यात, पाठीवर सपासप वार करून त्याला गंभीर जखमी केले आहे. जखमी युवकावर अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
    Pune Hit And Run: पुण्यात पुन्हा हिट अँड रन! मॉर्निंग वॉक करणाऱ्या तरुणाला कारची धडक, अन्… CCTVत अखेरचे क्षण कैद

    उपचारादरम्यान राजकुमारचा अतिसक्तस्राव झाल्याने मृत्यू

    अंबाजोगाई शहराला सुसंस्कृत म्हटले जाते. मात्र, याच शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अंबाजोगाई शहरातील पोखरी रोडवर सारडा नगरी जवळ दोन तरुणांनी राजकुमार साहेबराव करडे या तरुणाच्या गळ्यावर, डोक्यात, पाठीवर कोयता सदृश्य धारदार हत्याराने सपासप वार करून त्यास गंभीर जखमी केले. या हल्ल्यात राजकुमार गंभीर जखमी झाला. त्याच्यावर स्वाराती रुग्णालयात उपचार सुरू होती. मात्र डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करूनही अतिरक्तस्त्रावामुळे राजकुमारचा उपचार सुरु असतानाच मृत्यू झाला.

    हल्ला कोणी केला, का केला याबाबत अधिकृत माहिती नाही

    दरम्यान, हा हल्ला कोणी व कोणत्या कारणामुळे केला याबाबत सध्या कुठलीही अधिकृत माहिती नाही. अंबाजोगाई शहर पोलीस याप्रकरणाचा तपास करत असून लवकरच याप्रकरणी खुनाचा गुन्हा नोंद होणार असल्याचे समजते. मात्र, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रेमप्रकरणातून ही हत्या करण्यात आल्याची माहिती आहे.

    मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांड घटनेने जिल्हा हादरून गेलेला आहे. त्याचबरोबर जिल्ह्यात रोज नवनवीन घटना समोर येत असून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे.

    नुपूर उप्पल

    लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत, याआधी टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, इन मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ७ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक लिखाणाची आवड. गुन्हेगारीसंबंधित, विज्ञानविषयक बातम्यांमध्ये हातखंडा… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed