Palghar Couple ends life : मैत्रीण सोडून जाईल, या भीतीने जीतेंद्रला तिच्यासोबत ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’मध्ये राहायचे होते. त्यासाठी तो तिला आग्रह करत होता. मात्र ती तयार नव्हती.
काय आहे प्रकरण?
जीतेंद्र वर्मा (२४) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याचे एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत प्रेमसंबंध होते. या मुलीचे शिक्षण सुरू होते, तर जीतेंद्र हा एका खासगी कंपनीत कामाला होता. तो नायगाव पूर्वेच्या कोल्ही गावातील अरविंद चाळीत राहत होता.
मैत्रीण सोडून जाईल, या भीतीने जीतेंद्रला तिच्यासोबत ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’मध्ये राहायचे होते. त्यासाठी तो तिला आग्रह करत होता. मात्र ती तयार नव्हती. शनिवारी ती जीतेंद्रला भेटायला त्याच्या घरी गेली, याच मुद्द्यावरून दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर जीतेंद्र याने रात्रीच्या सुमारास घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.
Delhi Murder : शीss हे काय करताय तिघं? नवऱ्याला मित्रांसोबत आक्षेपार्ह अवस्थेत पकडलं, विवाहितेचा जीव घेतला, बॉडी कोंबली बेडमध्ये
हा प्रकार त्याच्या मैत्रिणीला समजताच, आपणच मृत्यूला जबाबदार आहोत या भावनेने ती नैराश्यात गेली. तिच्या कुटुंबीयांनी तिची समजूत काढली. मात्र नैराश्यात गेलेल्या या मुलीनेही रविवारी दुपारी घरात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली, असे नायगाव पोलिसांनी सांगितले.
धाकट्या भावाची हत्या करुन आत्महत्या
दुसरीकडे, दुचाकी चालविण्यावरून वाद होऊन मोठ्या भावाने लहान भावाची हत्या केली होती. पोलिस त्याच्या शोधात असताना आरोपीने सोमवारी कळमनुरी येथे झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले.
Buldhana Crime : बायको फोन लावतेय, पण उत्तर नाही! पोलिस गाडीत मृतावस्थेत, अनैतिक संबंधातून संपवल्याचा संशय
मनीष जयवंत शिरपुले (२३) रा. शेंबाळपिंप्री (पुसद) असे आत्महत्या केलेल्या आरोपीचे नाव आहे. मनीष याची दुचाकी नादुरुस्त झाल्याने घरीच पडून होती. ही दुचाकी त्याचा लहान भाऊ दिनेश शिरपुले याने दुरुस्त करून वापरण्यास सुरुवात केली. दुचाकी वापरण्यावरून दोघाभावांचे रोज भांडण होत होते. यातूनच २८ मार्चला त्याने दिनेशची हत्या केली होती. नंतर तो फरार झाला होता. शोध घेण्यात आला असता त्याचा मृतदेहच आढळला. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. वाढत्या गुन्हेगारीवरून चिंता व्यक्त होत आहे.

