Raj Thackeray and Jitendra Awhad on Aurangzeb Kabar : राज ठाकरे आणि जितेंद्र आव्हाड या दोन्ही नेत्यांचे एका मुद्द्यावर एकमत झाल्याचं समाजमाध्यमांवर दिसतं आहे. दोघांनीही औरंगजेबाच्या कबरीवरुन केलेल्या भाष्यात साधर्म्य दिसतं आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरे आणि जितेंद्र आव्हाड नेहमीच एकमेकांवर टीकास्त्र सोडताना दिसतात. तीन वर्षांपूर्वी ठाण्यातील एका सभेत राज ठाकरे यांनी आव्हाड यांचा विधानसभा मतदारसंघ असलेल्या मुंब्रा येथील गैरकृत्यांचा पाढाच वाचला होता. तर आव्हाड यांनी या ठीकेनंतर ठाकरे यांना जोरदार प्रत्युत्तर दिले होते. यासोबतच अनेक मुद्द्यांवरून ठाकरे आणि आव्हाड समर्थक एकमेकांवर टीकेचे बाण सोडत असतात. मात्र औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरून या दोन्ही नेत्यांचे एकमत झाल्याचे दिसून आले.
Raj Thackeray : ‘सरकारकडे आता पैसे नाहीत, ही देखील योजना बंद…’ लाडकी बहीण योजनेवरुन राज ठाकरेंचं मोठं विधान
आव्हाड आणि ठाकरे यांचं एका मुद्द्यावर एकमत
दोन आठवड्यापूर्वी विधिमंडळ अधिवेशनादरम्यान पत्रकारांशी बोलताना आव्हाड यांनी औरंगजेबाची कबर ही छत्रपतींच्या आणि मराठ्यांच्या शौर्याचे प्रतीक असल्याचा मुद्दा मांडला होता. साडेतीनशे वर्षांपूर्वीच्या इतिहासात अडकून न पडता सध्याच्या प्रश्नांकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे मत आव्हाड यांनी मांडले होते.
Raj Thackeray Speech : मुंबईतील चार नद्या मेल्या, आता पाचवी नदी मरायला आली…मिठी नदीच्या प्रदूषणावरुन राज ठाकरे कडाडले
गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंची औरंगजेबाच्या मुद्दावरुन सरकारवर टीका
त्याचवेळी रविवारी झालेल्या शिवाजी पार्क येथील मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात देखील राज ठाकरे यांनी औरंगजेबाच्या कबरीवरून राजकारण करणाऱ्यांना चांगलेच खडसावले. ठाकरे यांच्या त्या वक्तव्याचा आणि आव्हाड यांच्या टीकेचा आता एकत्रित व्हिडिओ समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल होत असून आता या दोन्ही पक्षाचे समर्थक नेमकी काय भूमिका घेतात हे पाहावे लागणार आहे.
Raj Thackeray : औरंगजेबाच्या कबरीवरुन राज ठाकरे आणि जितेंद्र आव्हाड यांचे एकमत, दोन्ही नेत्यांच्या भाषणांचे व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल
दरम्यान, रविवारी ३० मार्च रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवतिर्थावरुन राज्यातील अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी सध्या राज्यात सुरू असलेल्या औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यांवरुन राज्यातील इतर अनेक महत्त्वाचे मुद्दे बाजूला ठेवून यावर चर्चा सुरू आहे, असं म्हणत सरकारवर टीका केली. औरंगजेबाची कबर पाडावी की नाही? याबाबत बोलताना त्यांनी औरंगजेबाची कबर पाडू नये असं ठणकावून सांगितलं. कारण आपल्या मुलांना कळूदे की शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला इथे गाडलं आहे, मुलांना आपल्या महाराजांचा इतिहास कळूदे असं ते म्हणाले.

