• Fri. Mar 6th, 2026
    गरोदर हत्तीणीसोबत जे घडलं, त्यामुळे दिशा सालियन झालेली व्यथित; बॉयफ्रेण्डने सांगितलं..

    Disha Salian Case Update : दिशा सालियन प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे. दिशाच्या वडिलांनी हायकोर्टात याचिका दाखल केली असून गंभीर आरोप केले आहेत. आदित्य ठाकरे यांचे नाव घेत त्यांनी ही याचिका दाखल केलीये. पोलिसांनी दिशाच्या वडिलांचे विवाहबाह्य संबंध असल्याचे रिपोर्टमध्ये म्हटले आणि यामुळेच दिशा नैराश्यात असल्याचे सांगितले.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुंबई : दिशा सालियन प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आल्याचे बघायला मिळतंय. दिशा सालियनचा मृत्यू २०२० मध्ये झाला. दिशाच्या वडिलांनी मुंबई हायकोर्टात याप्रकरणी धाव घेतली आहे आणि त्यांनी थेट गंभीर आरोप केले. त्यांनी या याचिकेत आदित्य ठाकरे यांचे थेट नाव घेत काही आरोप केले आहेत. याचिकेत त्यांनी दिशावर सामुहिक बलात्कार करून तिची हत्या केल्याचा धक्कादायक दावा केल्याने मोठी खळबळ निर्माण झाली. दिशाच्या हत्येसंदर्भात काही आरोप करताना निलेश राणे हे देखील दिसले.

    दिशा सालियनच्या वडिलांवरच आरोप

    दिशाच्या वडिलांनी केलेल्या आरोपांनंतर त्यांच्याबद्दलच मोठा खुलासा झाला. दिशाच्या वडिलांचे विवाहबाह्य संबंध असल्याने त्यांना पैसे द्यावे लागत असल्याने ती निराश असल्याचे पोलिसांनी क्लोजर रिपोर्टमध्य लिहिल्याचा दावा केला जातोय. मुळात म्हणजे सध्या दिशा सालियन प्रकरणात मोठे खुलासे होताना दिसत आहेत. आरोपांनंतर दिशा सालियनचेच वडील अडचणीत सापडल्याचे बघायला मिळत आहे.
    Prashant Koratkar याची रोल्स रॉईस अखेर मुळशीत सापडली, पुण्याच्या प्रसिद्ध बिल्डरच्या फार्म हाऊसवर आलिशान गाडीया गोष्टीमुळे दिशा सालियन होती नैराश्यात

    आता दिशाबद्दल अजून एक माहिती ही पुढे आलीये. दिशा सालियनचा मित्र रोहन रायने एका मुलाखतीमध्ये मोठा खुलासा केला होता. रोहन रायने म्हटले की, दिशा ही प्राण्यांच्या समस्यांबद्दल नेहमीच टेन्शनमध्ये असायची. केरळमध्ये एका गरोदर हत्तीणीसोबत घडलेल्या घटनेनंतर दिशा नैराश्यात होती. पोलिसांनी वडिलांच्या विवाहबाह्य संबंधांमुळे ती निराश्यात असल्याचे त्यांच्या रिपोर्टमध्ये म्हटले होते.

    आदित्य ठाकरे यांच्यावर दिशा प्रकरणात आरोप

    दिशा सालियनचे प्रकरण सध्या कोर्टात सुरू आहे. दिशाच्या प्रकरणाबद्दल बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, हे प्रकरण कोर्टात सुरू आहे. यामुळे याबद्दल आताच बोलणे योग्य नाही. कोर्टाकडून आलेल्या निकाल्यानंतर सरकार याबद्दल भूमिका येईल. नारायण राणे यांनी काही दिवसांपूर्वीच एक पत्रकार परिषद घेत दिशा सालियन आणि सुशांत सिंह राजपूत यांच्या मृत्यूबद्दल खुलासा केला. दिशा सालियन प्रकरणात आदित्यचे नाव घेऊ नये, म्हणून उद्धव ठाकरेंनी फोन केल्याचा दावा राणेंनी केला.

    शितल मुंढे

    लेखकाबद्दलशितल मुंढेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. राजकीय, मनोरंजन, शिक्षण आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. लोकमत आणि टीव्ही 9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 6 वर्षांचा अनुभव.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed