Santosh Deshmukh Murder Case: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुलेचा जबाब समोर आला आहे. विष्णू चाटेच्या माध्यमातून वाल्मिक कराड संपर्कात होता. सरपंच देशमुखांची हत्या खंडणीतूनच झाली, असं घुलेनं जबाबात म्हटलं आहे.
आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून वाल्मिक कराडनंच खंडणी मागायला सांगितली होती, अशी कबुली घुलेनं चौकशीत दिली आहे. विष्णू चाटेनं कितीवेळा फोन केले, चाटे या प्रकरणात कसा मध्यस्थ होता, याची इत्यंभूत माहिती घुलेनं सांगितली आहे. ‘दुर्गापूजेच्या वेळी खंडणी मागितली होती. ती कराडच्या कार्यालयातून मागितली गेली. चाटेमार्फत कराड प्रत्येकवेळी संपर्कात होते. अपहरण ते हत्या या सगळ्या घटनाक्रमात चाटे संपर्कात होता,’ अशी माहिती घुलेनं पोलिसांना दिली आहे.
Santosh Deshmukh Murder Case: देशमुख हत्या प्रकरणात नवी थिअरी समोर; चाटे, केदारचा वेगळाच जबाब; सुग्रीव कराडचं नाव घेतलं
‘जगनमित्र कंपनीच्या कार्यालयात आवादा कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर थोपटेंना बोलावण्यात आलं होतं. २ कोटी खंडणी द्या, अन्यथा बीडमध्ये कुठेही काम करु देणार नाही. तुमचा मस्साजोगमधला प्लांट बंद करु, धमकी थोपटेंना सर्वांसमोर देण्यात आली होती,’ असं घुलेनं त्याच्या जबाबात म्हटलं आहे. ‘६ डिसेंबरला आवादा कंपनीच्या परिसरात मला मारहाण झाली. ८ तारखेला रात्री ८ वाजता मी तो प्रकार वाल्मिक कराडला सांगितला. त्यावर जे झालं ते चांगलं झालं नाही. यांना धडा शिकवायला हवा, असं कराड म्हणाला होता,’ असं घुलेनं जबाबात म्हटलं आहे. त्यामुळे या प्रकरणातील कराडचा सहभाग स्पष्ट झाला आहे.
बंदोबस्तच करतो! अजित पवार गरजले, पत्रकार उठला; ब्रेकिंग करायचीय का? दादांचा सवाल अन् मग..
सुदर्शन घुलेच्या जबाबात खंडणीचा स्पष्ट उल्लेख आहे. पण जयराम चाटे आणि महेश केदारच्या जबाबात खंडणीचा उल्लेख नाही. या तिघांचे जबाब वेगवेगळ्या आयपीएस अधिकाऱ्यांनी घेतलेले नाहीत. आपणच हे जबाब दिले असून ते योग्य असल्याचं तिन्ही आरोपींनी कोर्टाला सांगितलं आहे.

