• Fri. Mar 13th, 2026
    कराड ते घुले व्हाया चाटे, चार पानी जबाब; लिंक समोर आल्यानं वाल्मिक गोत्यात, आकाचा पाय खोलात

    Santosh Deshmukh Murder Case: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुलेचा जबाब समोर आला आहे. विष्णू चाटेच्या माध्यमातून वाल्मिक कराड संपर्कात होता. सरपंच देशमुखांची हत्या खंडणीतूनच झाली, असं घुलेनं जबाबात म्हटलं आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    बीड: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुलेचा जबाब समोर आला आहे. विष्णू चाटेच्या माध्यमातून वाल्मिक कराड संपर्कात होता. सरपंच देशमुखांची हत्या खंडणीतूनच झाली, असं घुलेनं जबाबात म्हटलं आहे. या प्रकरणातील अन्य दोन आरोपी जयराम चाटे आणि महेश केदार यांच्या जबाबांमध्ये खंडणीचा उल्लेख नव्हता. पण घुलेच्या जबाबात खंडणीचा स्पष्ट उल्लेख आहे. दुर्गापूजेच्या कालावधीच खंडणीची मागणी करण्यात आली होती, असं घुलेनं त्याच्या जबाबात स्पष्ट म्हटलं आहे.

    आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून वाल्मिक कराडनंच खंडणी मागायला सांगितली होती, अशी कबुली घुलेनं चौकशीत दिली आहे. विष्णू चाटेनं कितीवेळा फोन केले, चाटे या प्रकरणात कसा मध्यस्थ होता, याची इत्यंभूत माहिती घुलेनं सांगितली आहे. ‘दुर्गापूजेच्या वेळी खंडणी मागितली होती. ती कराडच्या कार्यालयातून मागितली गेली. चाटेमार्फत कराड प्रत्येकवेळी संपर्कात होते. अपहरण ते हत्या या सगळ्या घटनाक्रमात चाटे संपर्कात होता,’ अशी माहिती घुलेनं पोलिसांना दिली आहे.
    Santosh Deshmukh Murder Case: देशमुख हत्या प्रकरणात नवी थिअरी समोर; चाटे, केदारचा वेगळाच जबाब; सुग्रीव कराडचं नाव घेतलं
    ‘जगनमित्र कंपनीच्या कार्यालयात आवादा कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर थोपटेंना बोलावण्यात आलं होतं. २ कोटी खंडणी द्या, अन्यथा बीडमध्ये कुठेही काम करु देणार नाही. तुमचा मस्साजोगमधला प्लांट बंद करु, धमकी थोपटेंना सर्वांसमोर देण्यात आली होती,’ असं घुलेनं त्याच्या जबाबात म्हटलं आहे. ‘६ डिसेंबरला आवादा कंपनीच्या परिसरात मला मारहाण झाली. ८ तारखेला रात्री ८ वाजता मी तो प्रकार वाल्मिक कराडला सांगितला. त्यावर जे झालं ते चांगलं झालं नाही. यांना धडा शिकवायला हवा, असं कराड म्हणाला होता,’ असं घुलेनं जबाबात म्हटलं आहे. त्यामुळे या प्रकरणातील कराडचा सहभाग स्पष्ट झाला आहे.
    बंदोबस्तच करतो! अजित पवार गरजले, पत्रकार उठला; ब्रेकिंग करायचीय का? दादांचा सवाल अन् मग..
    सुदर्शन घुलेच्या जबाबात खंडणीचा स्पष्ट उल्लेख आहे. पण जयराम चाटे आणि महेश केदारच्या जबाबात खंडणीचा उल्लेख नाही. या तिघांचे जबाब वेगवेगळ्या आयपीएस अधिकाऱ्यांनी घेतलेले नाहीत. आपणच हे जबाब दिले असून ते योग्य असल्याचं तिन्ही आरोपींनी कोर्टाला सांगितलं आहे.

    कुणाल गवाणकर

    लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा

    मुंबई महानगर परिसरातील नामांकित खासगी रुग्णालयांनी एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेत सहभाग घ्यावा – सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर – महासंवाद
    ‘डायट’च्या माध्यमातून शिक्षणात अग्रेसर राहण्यासाठी प्रयत्न करा- शिक्षणमंत्री दादाजी भुसे – महासंवाद
    आगामी वर्षात सीपीआरमध्ये अत्याधुनिक उपचार पद्धती राबवणार – वैद्यकीय मंत्री हसन मुश्रीफ – महासंवाद

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed