Unseasonal rains in Konkan Ratnagiri Sindhudurg : कोकणात अवकाळी पावसाने हजेरी लावली असून या पावसामुळे आंबा आणि काजू बागायतदार चिंतेत पडला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्गातील अनेक भागात पावसाने हजेरी लावली.
दिवसभर उकाड्याने हैराण होत असताना मंगळवारी, २५ मार्च रोजी रात्री रात्री ९.३० वाजण्याच्या दरम्यान अचानक ढगांचा गडगडाट होऊन रत्नागिरी तालुक्यातील पाली, खानू, वळके, चरवेली, नाणीज या भागात अवकाळी पाऊस कोसळू लागला. या पावसाने उकाड्यापासून तात्पुरता दिलासा मिळाला असला, तरी आंबा, काजूसह कोकणी रानमेवाचं मात्र हा अवकाळी पाऊस नुकसान करणार आहे. यंदा आंब्याचं पीक कमी असताना आधीच अडचणीत सापडलेला बागायतदार अवकाळी पावसामुळे मात्र चिंतेत पडला आहे.
Thane News : ठाण्यात उन्हाच्या झळांपासून रक्षण करण्यासाठी सिग्नलवर कापडी जाळीचे आच्छादन, महानगरपालिकेचा उपक्रम
यंदा आधीच आंबा हा जवळपास ३० ते ४० टक्के इतकाच असल्याचं सांगितलं जात आहे. त्यातच अवकाळी पावसाने रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्हातही काही ठिकाणी अवकाळीने दाणादाण उडवल्याने बागायतदारांच्या अडचणी वाढल्या आहेत. या पावसामुळे आंबा, काजू बागायतदार मोठ्या संकटात, चिंतेत सापडला आहे. हा पाऊस अवकाळी असल्याने फळ बागायतीचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. रत्नागिरी जिल्ह्यात रात्री उशिरा संगमेश्वर देवरुख परिसरात तसेच गणपतीपुळे परिसरातही जोरदार पाऊस झाला आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी दोडामार्ग परिसरातही जोरदार पाऊस झाला आहे.
HSRP बाबत मोठी बातमी, नंबरप्लेटसाठी मुदतवाढ; कोणत्या वाहनासाठी किती पैसे लागणार?
अवकाळी झालेल्या पावसाने अनेकांची त्रेधातिरपीट उडवली आहे. तळ कोकणात पावसामुळे हातातोंडाशी आलेला आंबा, काजू या महत्त्वाच्या पिकांसह कोकणातील इतर रानमेवा अडचणीत सापडला आहे. दरवर्षी आंबा बागायतदारांसमोर बदलत्या लहरी हवामानामुळे मोठं संकट उभं राहू लागलं आहे.
Ratnagiri News : कोकणात अवकाळी पाऊस, रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये आंबा, काजू बागायतदार चिंतेत
दरम्यान, पाली बाजारपेठेत मुंबई, गोवा आणि मिऱ्या नागपूर या दोन्हीही राष्ट्रीय महामार्गावरील कामे सुरू असल्याने काही ठिकाणी रस्त्यावर चिखल झाला आहे. दिवसभर कोकणात उष्णतेने हैराण झालेल्यांना या पावसाने काहीसा दिलासा मिळाला आहे. तसंच पश्चिम महाराष्ट्रातही जोरदार पाऊस झाला असून सातारा, कोल्हापूरमधील काही भागातही जोरदार पावसाने हजेरी लावली आहे.

