• Wed. Jun 17th, 2026

    Sanjay Raut : ‘स्वत:ला जे कोणी आहेत ना बालहिंदुत्त्ववादी, त्यांची…; संजय राऊतांचा नाव न घेता राणेंवर हल्लाबोल

    Sanjay Raut : ‘स्वत:ला जे कोणी आहेत ना बालहिंदुत्त्ववादी, त्यांची…; संजय राऊतांचा नाव न घेता राणेंवर हल्लाबोल

    भाजप मंत्री नितेश राणेंच्या वादग्रस्त विधानांवर संजय राऊतांनी टीका केली आहे. राणेंच्या विधानांमुळे हिंदू-मुस्लिमांमधील तणाव वाढला असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. राऊतांनी फडणवीसांना अडकवण्याचे षडयंत्र असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर रत्नाच्या भाषणांवर टीका करत मंत्रिमंडळाची मनोरूग्ण चाचणी करण्याची मागणी केली आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुंबई : महायुती सरकारमधील भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी केलेली वादग्रस्त विधानांची चर्चा झाली. शिवाजी महाराजांसोबत एकही मुस्लिम शिलेदार मावळा नव्हता, त्यासोबतच औरंगजेबाच्या कबरीबाबतही त्यांनी केलेल्या विधानानंतर हा विषय पेटला. (Sanjy Raut on Nitesh Rane) यावरून हिंदू-मुस्लिमांमधील तेढ वाढवणार ते विधान करत असल्याची टीका विरोधी नेत्यांनी केली. नागपूर हिंसाचाराला या मंत्र्यांची वक्तव्य जबाबदार असल्याचाही आरोप केला गेला. याचाच धागा पकडत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मंत्री नितेश राणेंवर नाव न घेता टीका केली

    देवेंद्र फडणवीसांना स्वत: विषयीचं चांगलं सत्य पचवायची ताकद राहिली नाही. नागपूर हिंसाचार ही फडणवीसांना अडकवण्याचं षडयंत्र आहे. हेच आदित्य ठाकरे आणि जलील यांनीही म्हटलं आहे. मीही हेच म्हणालो, पण संताजी धनाजीप्रमाणे स्वप्नातसुद्धा संजय राऊत दिसतात. ते असं म्हणाले यांच्यावर उपचार केले पाहिजेत. तुमचं संपूर्ण सरकार मनोरूग्ण आहे.विशेष तरतूद करून सरकारने मंत्रिमंडळाची मनोरूग्ण चाचणी केली पाहिजे. ज्या पद्धतीने तुमचे मंत्री बोलतायेत, धांगडधिंगा घालतायेत, भ्रष्टाचार करतायेत, स्वत:ला जे कोणी आहेत ना बालहिंदुत्त्ववादी त्यांची भाषा बघा. काय चाललंय विधानसभा आणि विधानपरिषदेमध्ये, भाजपचं मंत्रिमंडळ आहे त्यांच्यावर सरकारी खर्चाने उपचार करा, अशी टीका करताना संजय राऊतांनी आमदार आणि मंत्री नितेश राणे यांचं नाव न घेता निशाणा साधला.

    दोन्ही आत्महत्या आहेत हे सिद्ध झालेलं आहे. पण राजकीय बदनामीचा कट करण्यासाठी या दोन्ही आत्महत्यांना हत्या असल्याचा रंग देण्यात आला. पाच वर्षानंतर दिशा सालियानच्या वडिलांना काही लोकांनी पुढे केलं. याचा तपास करावा यासाठी याचिका कोर्टात नेली, सुशांत सिंग प्रकरण संसदेपर्यंत गेलं. जसं औरंगजेबाचं राजकारण चाललं आहे तसं मृतांचं राजकारण भाजपने सुरू केलं आहे. सगळ्यांना त्रास झालेला आहे त्यांचा हेतू काही सिद्ध झाला नाही. कारण आमच्यासारखे लोकं म्हणजे ठाकरे परिवार, अनिल परबांसारखी लढत असल्याचं राऊतांनी म्हटलं आहे.

    हरिश मालुसरे

    लेखकाबद्दलहरिश मालुसरे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. क्रीडा, राजकीय आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. झी 24 तास आणि टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 04 वर्षांचा अनुभव.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed