Sugar Production: निवडणूक, अनियमित हवामान, उसावर अकाली आलेला फुलोरा आणि रोगाचा प्रादुर्भाव यांमुळे देशातील साखर उत्पादनात १७ टक्क्यांनी घट झाली आहे.
मागील आर्थिक वर्षांतील देशातील २९० लाख टनाच्या तुलनेत यंदा २४१ लाख टन उत्पादन झाले आहे. या हंगामात ५३३ साखर कारखान्यांपैकी ३८० कारखान्यांचा गाळप हंगाम आटोपला आहे. गेल्या वर्षी याच दिवशी ५३४ कारखान्यांपैकी केवळ २४० कारखाने बंद झाले होते. साखरेचे उत्पादन घटल्याने दरांत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
Nashik Crime: ‘हॅप्पी होळी’ म्हणत स्वच्छता कर्मचाऱ्यास पेटवलं; कारण ठरली दारु, नाशिक बसस्थानकात नेमकं काय घडलं?
‘उसाच्या गळितावर आणि साखरेच्या उताऱ्यावर परिणाम झाल्याने साखर कारखाने लवकर बंद होत आहेत. महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या साखर उत्पादनात अग्रेसर राज्यांतील साखर उद्योगाला फटका बसला आहे. राज्यात ८३८ लाख टन गाळप झाले असून, मागील हंगामात झालेल्या १,०३० लाख टनापेक्षा ते १८.६५ टक्क्यांनी कमी आहे. ७९.२० लाख टन साखर उत्पादन झाले असून, ते मागील वर्षीच्या १०५ लाख टनापेक्षा २४ टक्क्यांनी कमी आहे. राज्यातील २००पैकी १८० कारखाने बंद झाले आहेत. मागील वर्षी ही संख्या केवळ १०३ होती,’ अशी माहिती राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे उपस्थित होते.
Child Marriage: ओडिशात दररोज तीन बालविवाह; नबरंगपूर जिल्ह्यात सर्वाधिक घटनांची नोंद, काय सांगते आकडेवारी?
‘उत्तर प्रदेशातील उसाचे गाळप ८७५ लाख टन झाले असून, ते मागील वर्षी ८७६ लाख टन होते. मागील वर्षी ९२ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते आणि यंदा ८४ लाख टन उत्पादन झाले आहे. केंद्र सरकारच्या अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने चालू आर्थिक वर्षासाठी देशांतर्गत घरगुती वापरासाठी साखरेचा विक्री कोटा १३७.५० लाख टन निर्धारित केला होता. उत्पादन घटल्याने एस ग्रेड साखरेची किंमत ३,७८० ते ३,८३० रुपये प्रतिक्विंटल आणि एम-ग्रेड साखरेची किंमत ३,९६५ ते ४,१०० रुपये प्रतिक्विंटल आहे. इथेनॉल उत्पादनात प्रगती झाली असून, ३०३ कोटी लिटर इथेनॉल पेट्रोल मिश्रणासाठी वापरले आहे. आगामी आर्थिक वर्षांत साखर उत्पादनात वाढ अपेक्षित आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकात अंदाजे ११० ते १२० आणि देशात ३५० लाख टन उत्पादन होण्याचा अंदाज आहे,’ असे पाटील यांनी सांगितले.
माणिकराव कोकाटे पुन्हा अडचणीत; नाशिक जिल्हा बॅंकेने पाठवली नोटीस, मामला कोटींचा, नेमकं प्रकरण काय?
‘एआय’मुळे उस उत्पादनात वाढ शक्य’
‘देशात उसाचे क्षेत्र ६० लाख हेक्टर असून, उत्पन्न ८० टन प्रतिहेक्टरवर थांबले आहे. उसाचे दर्जेदार उत्पादन, आर्थिक विकास आणि साखर उद्योगाला स्थैर्य मिळण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर अनिवार्य झाला आहे. ‘एआय’च्या मदतीने उसाचे उत्पादन ४० टक्क्यांनी वाढवता येते आणि ३० टक्के उत्पादन खर्च वाचविता येतो, हे मायक्रोसॉफ्ट कंपनी आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाने प्रात्यक्षिकांसह दाखविले आहे. बारामती येथील कृषी विज्ञान केंद्रात याचे नुकतेच सादरीकरण करण्यात आले,’ असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.
रास्त व किफायतशीर दर (एफआरपी) एकरकमी १४ दिवसांत देण्याचा कायदा आहे. मात्र, एफआरपी टप्प्याने सामंज्यस्याने दिली जात होती; परंतु न्यायालयाच्या निकालामुळे साखर कारखान्यांना आता ‘एफआरपी’ एकरकमी द्यावीच लागेल. – हर्षवर्धन पाटील, अध्यक्ष, राष्ट्रीय साखर कारखाना महासंघ

