Washim Crime News : वाशिममध्ये एका मुलाचं अपहरण करुन नंतर त्याची हत्या केल्याची घडना घडली असून याप्रकरणात ९ दिवसांनी उलगडा झाला आहे. खंडणीचा बनाव रचून पोलिसांना भरकटवण्यात आलं, अखेर घटना उघडकीस आली.
अपहरण झालं आणि… धक्कादायक घटना समोर
वाशिमच्या बाभूळगाव येथील अनिकेत सादुडे हा १४ वर्षीय मुलगा बेपत्ता झाल्यानंतर त्याच्या घरासमोर ६० लाख रुपयांची खंडणी मागितल्याचं पत्र आढळून आलं होतं. या प्रकरणी पोलीस मागील नऊ दिवसांपासून अनिकेतचा शोध घेत होते. मात्र शोधादरम्यान अनिकेतचा मृतदेह आढळून आला आणि एकच खळबळ उडाली आहे.
Nagpur News : दोन वर्षीय चिमुकलीवर मोकाट कुत्र्यांचा हल्ला, जागीच मृत्यू; आईचा काळीज पिळवटून टाकणारा टाहो
पोलिसांनी याप्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिकेतचं अपहरण केल्यानंतर अवघ्या अर्धा तासातच पूर्ववैमन्यासातून अनिकेतचा गळा दाबून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर गावाजवळच असलेल्या निर्जन ठिकाणी दगडांच्या खाली त्याचा मृतदेह लपवण्यात आला होता. तसंच पोलिसांचं हत्येच्या घटनेपासून लक्ष विचलित व्हावं यासाठी आरोपींनी पाच पानी पत्र लिहून ६० लाखाची खंडणी मागितली होती. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार हा अनिकेतच्या घराजवळ राहणार वीस वर्षीय प्रणय पदम असल्याचं समोर आलं आहे. त्याला गावातीलच शुभम इंगळे या तरुणाने अनिकेतचं अपहरण करण्यासाठी मदत केली होती.
Raigad News : शिमग्याचा कार्यक्रम आटोपून निघाले, पण नियतीच ठरली निष्ठूर; दोघांवर काळाचा घाला, संपूर्ण गाव हळहळले
अनिकेतचा खून केल्यानंतर पोलिसांचा तपास चुकीच्या दिशेने वळवण्यासाठी आणि संभ्रम निर्माण करण्यासाठी आरोपींनी बनाव रचला. त्यांनी अपहरणाचं, खोट्या खंडणीचं पत्र अनिकेतच्या घरासमोर ठेवलं होतं. मात्र, पोलिसांच्या तपासामुळे हा कट उघडकीस आला आणि आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या.
Washim News : अपहरण करुन हत्या, नंतर खंडणीचा बनाव रचला; ९ दिवसांनी असा झाला उलगडा, वाशिम हादरलं
मुख्य सूत्रधाराला अटक करुन केस फास्ट ट्रक कोर्टात चालवावी –
अनिकेतचं १२ मार्च रोजी अपहरण करून त्याची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात गावातल्याच २० वर्षीय दोन तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेऊन या हत्येचा छडा लावला. मात्र आता अनिकेतच्या वडिलांनी या प्रकरणात मुख्य सूत्रधार वेगळा असल्याची शंका उपस्थित केली असून ही केस सीबीआय किंवा सीआयडीकडे देऊन मुख्य सूत्रधाराला अटक करावी आणि फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा करावी अशी मागणी केली आहे.

